जिल्हा परिषदेचे बक्षीस वितरण जिल्हाधिकारी
.
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धामध्ये जसा जोश होता तसाच जोश बक्षीस वितरणाच्या सोहळ्यात दिसून येत होता. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी स्वत: नियोजनाची जबाबदारी घेतली होती. त्यांनीच प्रास्ताविकामध्येच ऊरी या चित्रपटातील डायलॉग बोलून ‘हाऊ द जोश’ असे म्हणत उपस्थित सर्वच जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्यामध्ये जोश भरला गेला. जिल्हाधिकारी ऊचेश जयवंशी आणि पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते विजेत्यांना खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले.
सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेतल्या विजेत्यांचा गौरव रविवारी सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी ऊचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, रोहिणी ढवळे, प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली बडदे, जिल्हा कृषी अधिकारी विजय माईनगर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, अभियंता श्रीपाद जाधव, राहुल आहिरे, मुख्य लेखाधिकारी विकास सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले.
यावेळी जिल्हाधिकारी ऊचेश जयवंशी म्हणाले, मी वाघमळे मॅडमचे भाषण ऐकत होतो. त्यांनी जे जे सांगितले ते ते खेळाडूंमध्ये मला पहायला मिळाले. एवढी एनर्जी आता आहे तशीच स्पर्धेवेळी असेल. खेळामुळे आपण पाहिजे ते कऊ शकतो. खेळामुळे केवळ स्वास्थ मिळत नाही तर आयुष्यातला आनंद मिळतो. खेळामुळे सयंम मिळतो. जिंकण्याची एक उर्जा मिळते. मी या स्पर्धेला येवू शकलो नाही याची मला खंत वाटते. सीईओ साहेब नाहीत हे मला जर माहिती असते तर मी निश्चित येवून गेलो असतो. हा सुंदर सोहळा आयोजित केल्याचीच सीईओ साहेबांना तुम्ही भेट दिली आहे. याच वेळी संकल्प करा की पुढच्या वर्षी आणखी चांगला खेळ कऊन या स्पर्धेत कसे चांगले बक्षीस मिळवता येईल. ही स्पर्धा कशी सुऊ राहिल यासाठी पाठपुरावा करा, मागणी करा, असे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक समीर शेख म्हणाले, पाठीमागे एकदा खिलारी साहेब बोलता बोलता स्पर्धेबाबत संकल्पना बोलून गेले होते. त्यांच्या त्या संकल्पनेची अंमलबजावणी खूप छान झाली. त्यांनी चांगले नियोजन केले. खेळामुळे एका†त्रत काम कसे करावे हे तंत्र शिकता येते. काळाच्या ओघात चांगल्यावाईट गोष्टी येत असतात. त्याला सामोरे जायला खेळ शिकवतो. मला वाटते की संपूर्ण ा†जल्हा पा†रषद टीम ा†वजेती झालेली आहे. प्रत्येकाने स्वत:च्या स्वास्थाकडे लक्ष दिले पाहिजे. दररोजचे काम आपण करत असतोच परंतु हे करत असताना आपल्या तंदूऊस्तीचीही काळजी घेतली पाहिजे. त्याकरता मैदानी खेळ महत्वाचा आहे. खेळामुळे आयुष्य खूप छान जगता येते, असे त्यांनी सांगितले.