वार्ताहर/ पाचल
राजापूर तालुक्यात गेले आठ दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अर्जुना धरण ओव्हरफ्लो झाले असून त्यातून पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू आहे. त्यामुळे अर्जूना नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे.
मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यातील अनेक धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. अर्जुना धरणात पाण्याचा साठा मुबलक झाल्याने यंदा पाणी टंचाई फारशी जाणवणार नाही. धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होऊ लागला आहे. हा विसर्ग कोकणाच्या देखणेपणात अधिकच भर घालत आहे.