ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अर्थसंकल्पापूर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. त्यानंतर अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्प घेऊन सभागृहाकडे रवाना झाल्या आहेत. थोडय़ाच वेळात त्या अर्थसंकल्पाच्या भाषणाला सुरुवात करतील.
मोदी सकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प असून, सितारामन यांचा अर्थमंत्री म्हणून चौथा अर्थसंकल्प असणार आहे. कोरोनाचे संकट दोन वर्षांपासून ओढावलं असून, अशा परिस्थितीत देशासह जागतिक अर्थव्यवस्थेसमोर यातून सावरण्याचे आव्हान आहे. अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यासाठी या अर्थसंकल्पात काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांचा टॅबमधून कुठल्या क्षेत्रासाठी काय तरतूद असणार आहे हे पाहावं लागणार आहे.