नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी राज्यसभेत काँग्रेसला कडक शब्दात फटकारले. मोदींची कारकीर्द ही अमृतकाळ नसून राहूकाळ असल्याचा आरोप काँग्रेस सदस्यांनी अर्थसंकल्प सादरीकरणानंतर केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना अर्थमंत्र्यांनी अमृतकाळ आमचा आणि राहूकाळ तुमचा असा खरपूस समाचार घेतला. पक्षाचे वरि÷ नेते पक्ष सोडून बाहेर पडत आहेत, हा राहूकाळ आहे. ‘राहूकाळा’चा सामना करणाऱया काँग्रेस पक्षाला 44 जागा मिळाल्या आहेत. आजपर्यंत त्यांना कोणत्याही निवडणुकीत आपली ताकद सिद्ध करता आलेली नाही. तसेच नजिकच्या काळातही त्यांना आपल्या जागा वाढवता येणार नसल्याचा हल्लाबोल सीतारामन यांनी चढवला. यापूर्वी चालू आठवडय़ाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार टीका केली होती.