नवी दिल्ली
: चालू आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 9 टक्क्मयांची घसरण राहणार असल्याचा अंदाज नुकताच आशियाई विकास बँकेने (एडीबी)व्यक्त केला आहे.
एडीबीने आपला अहवाल मंगळवारी सादर केला आहे, यामध्ये ही माहिती दिली आहे. भारतामध्ये कोरोना विषाणूच्या संकटामुळे आर्थिक गतीचा वेग मंदावला आहे आणि याचा प्रभाव ग्राहकांच्या मागणीवर मोठय़ा प्रमाणात पडला असून यामुळे ही घसरण राहणार असल्याचे म्हटले आहे.
आगामी वित्त वर्ष 2021-22 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठय़ा प्रमाणात तेजी निर्माण होणार असल्याचे संकेत व्यक्त केले आहेत. एडीबीने अवास्तव व्यवसायातील गती निर्माण होण्याचा लाभ मिळून भारताचा आर्थिक विकासातील वृद्धीदर आठ टक्क्मयांवर राहणार असल्याची अपेक्षा आहे.
आगामी वित्त वर्ष आणि पुढील अर्थव्यवस्थेमधील वृद्धीसह महामारीवर अंकुश राखत उपाय, शोध आणि अन्य वापराच्या क्षमतेचा विस्तार करुन हा बदल करण्यावर भर मिळण्याचे संकेत एडीबीचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ यासुयुकी यांनी व्यक्त केले आहेत.