प्रतिनिधी/ रत्नागिरी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सिताराम यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून कोकणाच्या पदरी निराशा पडली आह़े आंबा-काजू व मच्छीमाराचे प्रश्न मार्गी लागतील अशी आशा या अर्थसंकल्पातून होत़ी याबाबत कोणतेही ठोस आश्वासन या अर्थसंकपामधून दिसून आलेले नाह़ी समाधानाची बाब म्हणजे कोकण रेल्वेचे दुपदरीकरण व मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्णत्वास जाईल, अशी अशा निर्माण झाली आह़े
कोकणातील बंदर विकासासाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात होईल अशी अशा व्यक्त करण्यात येत होत़ी त्याप्रमाणे 5 बंदराचे अत्याधुनिकरण करणार असल्याचे सितारामन यांनी अर्थसंकल्पातून सांगितल़े मात्र ही पाचही बंदरे दक्षिण भारतामधील आहेत़ यामध्ये महाराष्ट्रातील एकही बंदराचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आह़े त्यामुळे कोकणातील बंदरांच्या विकासासाठी अजून थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागणार असेच दिसून येत आह़े
मुंबई-गोवा महामार्गाचे रेंगाळलेल्या कामामुळे कोकणवासीय हैराण झाले आह़े कंत्राटदारांच्या हलगर्जीपणाचा मोठा फटका या महामार्गावरून प्रवास करणाऱयांना बसत आह़े अर्थसंकल्पामध्ये देशातील 11 हजार किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यासाठी सुमारे 65 हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आह़े यामध्ये मुबई ते कन्याकुमारी मार्गाचा समावेश करण्यात आला आह़े त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम अधीक जलद गतीने होईल अशी अशा निर्माण झाली आह़े
कोकण रेल्वेचे दुपदरीकरण व विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर आह़े कोरोनाचा मोठा फटका या कामाला बसला होत़ा देशातील रेल्वे लाईनचे दुपदरीकरण करण्यात येईल अशी घोषणा सितारामन यांनी अर्थसंकल्पातून केल़ी त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेच्या दुपदरीकरणाला निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे जाणकारांकडून सांगण्यात येत आह़े मात्र कोकणासाठी काहीही वेगळे असे या अर्थसंकल्पातून दिसून आलेले नाह़ी
कोरोना विषाणूमुळे अर्थव्यवस्था कोलमडलेली दिसून येत आह़े छोटे उद्योग बंद पडले आहेत़ तसेच बेरोजगारी देखील वाढलेली आह़े याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आह़े त्यामुळे नव्याने योजनांची घोषणा न करता मागील कामेच पुढे चालू ठेवण्याकडे केंद्र शासनाचा कल या अर्थसंकल्पातून जाणवत आह़े