जिल्हय़ाचे प्रभारी सचिव एल. के. अतिक यांची अधिकाऱयांना ऑनलाईनच्या माध्यमातून सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
सरकारने विविध विकासकामांसाठी प्रत्येक विभागाला चालू आर्थिक वर्षामध्ये जो निधी दिला आहे तो निधी पूर्णपणे खर्च करावा आणि विकास साधावा, असे जिल्हय़ाचे प्रभारी सचिव आणि ग्रामीण विकास व पंचायतराज विभागाचे मुख्य सचिव एल. के. अतिक यांनी अधिकाऱयांना सांगितले.
गुरुवारी ऑनलाईनच्या माध्यमातून अधिकाऱयांना सूचना केली आहे. मार्च महिना जवळ येत आहे. त्यामुळे मंजूर झालेल्या कामाचा निधी पूर्णपणे खर्च करा, जेणेकरून तो निधी परत जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत कोणतीही कामे प्रलंबित ठेवू नका. अधिकाऱयांनी याची खबरदारी घ्यावी. विशेषकरून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी याबाबत गांभीर्याने घ्यावे, असे देखील त्यांनी सांगितले.
लसीकरण मोहीम तीव्रगतीने राबवा
कोरोना लसीकरण पहिल्या टप्प्यात 100 टक्के पूर्ण झाले आहे. त्याप्रमाणे दुसरा डोस आणि बुस्टर डोस तसेच 15 व 17 वयोगटातील मुलांचे लसीकरण 100 टक्के यशस्वीपणे पार पाडावे, यासाठी प्रयत्न करा. रामदुर्ग, खानापूर, रायबाग या तालुक्मयांमध्ये लसीकरण मोहीम संथगतीने सुरू आहे. त्याठिकाणी अधिक लक्ष देऊन ही मोहीम तीव्रगतीने राबवावी, अशी अधिकाऱयांना सूचना केली आहे.
याचबरोबर ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी इमारती बांधण्यासाठी निधी मंजूर झाला आहे त्या निधीमधून तातडीने इमारतींची उभारणी करावी. समाज कल्याण, मागासवर्गीय कल्याण निधी, अल्पसंख्याकांसाठी असलेला निधी, विद्यार्थी वसतिगृह, वसती शाळांच्या सुधारणेबाबत अधिकाऱयांनी वरचेवर भेट देऊन पाहणी करावी, तसेच त्याठिकाणी मुबलक सुविधा उपलब्ध कराव्यात, असे सांगितले.
विद्यार्थ्यांना देण्यात येणारा आहाराचा मेनू, मुलभूत सुविधा तसेच मुलांच्या संरक्षणामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत, कोणत्याही त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकाऱयांना सूचना करा. विशेष अधिकाऱयांची नियुक्तीदेखील करावी, असे त्यांनी सांगितले.
वनविभागात सुरू असलेल्या कामांची ड्रोनद्वारे संपूर्ण माहिती घ्यावी. त्याचा अहवालदेखील सादर करावा, असे सांगितले. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या दरम्यान जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी लसीकरणाबाबत माहिती देताना, पहिला डोस 100 टक्के झाला आहे तर दुसरा डोस 92 टक्के झाला आहे. येत्या काही दिवसांत 100 टक्के लसीकरण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण केल्याची माहिती दिली.
शेतकऱयांना आतापर्यंत 94.80 कोटी रुपये नुकसानभरपाई दिली गेली आहे. संबंधित शेतकऱयांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाचे संयुक्त सचिव शिवनगौडा पाटील यांनी दिली. सध्या जिल्हय़ामध्ये रब्बी पेरणीसाठी लागणारी बियाणे, खते तसेच इतर कोणतीही कमतरता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी विविध कामांसंदर्भात माहिती दिली. यावेळी अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, समाज कल्याण विभागाच्या संयुक्त सचिव उमा सालीगौडर, महिला व बालकल्याण विभागाचे उपसंचालक बसवराज वरवट्टी, बागायत विभागाचे मुरगोड यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.