सुविधांपेक्षा असुविधांचा डेंगरच अधिक : कामे तातडीने पूर्ण करा : अन्यथा रास्ता रोकोचा इशारा
प्रतिनिधी /बेळगाव
शहरवासियांना चांगल्या सुविधा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. मात्र, सुविधांपेक्षा असुविधांचा डेंगर विकासकामे राबविण्यात येणाऱया ठिकाणी निर्माण होत आहे. वीरभद्रनगर येथील अर्धवट सीडीच्या कामामुळे वाहने गटारीमध्ये कोसळण्याचे प्रकार दररोज घडत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. अर्धवट काम तातडीने पूर्ण करा, अन्यथा रास्ता रोको करू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
वीरभद्रनगर येथील विकासकामे सुरू करून दोन वर्षे होत आली. पण अर्धा किलोमीटर असलेल्या रस्त्याचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. धर्मनाथ चौक ते एसपी ऑफिस कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याचे काम ऑगस्ट 2019 मध्ये सुरू करण्यात आले होते. या ठिकाणी रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. पण दुतर्फा करण्यात येत असलेले गटारीचे बांधकाम, फुटपाथ आणि विविध विद्युत वाहिन्या, डेनेजचे काम अपूर्ण आहे. याचा फटका परिसरातील नागरिकांना बसत आहे. वीरभद्रनगरला जोडणाऱया रस्त्यावर सीडीचे काम अर्धवट असून पाईप घालून तात्पुरत्या स्वरुपात रस्ता करण्यात आला आहे. हा रस्ता मुख्य असल्याने शिवाजीनगर, वीरभद्रनगर अशा विविध भागातील वाहनधारक या रस्त्याने ये-जा करीत असतात. पण सीडीच्या अर्धवट कामामुळे वाहने गटारीत कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. काही वेळा चार चाकी वाहने अडकून पडत असल्याने वाहनधारकांची त्रेधातिरपीट होत आहे. परिसरातून ये-जा करणाऱया पादचाऱयांनादेखील धोका निर्माण झाला आहे. दररोज दोन-चार वाहने या ठिकाणी अडकत असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली
आहे.
डेनेज वाहिन्या व विद्युत वाहिन्या उघडय़ावर
या कॉर्नरवरील गटारीचे बांधकाम अर्धवट असून डेनेज वाहिन्या व विद्युत वाहिन्या उघडय़ावर आहेत. या ठिकाणी जलवाहिनी सातत्याने फुटत असल्याने पाणी वाया जात आहे. डेनेज चेंबरचे बांधकाम अर्धवट झाल्याने सांडपाणी गटारीमधून वाहत आहे. दोन गटारी मिळणाऱया ठिकाणी व्यवस्थित बांधकाम करण्यात आले नसल्याने व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. गटारीमधूनच विद्युत वाहिन्या, जलवाहिन्या व गॅसवाहिन्या घातल्याने स्मार्ट सिटीच्या कामकाजाचा नमुना चव्हाटय़ावर आला आहे.
मनपा-स्मार्ट सिटीकडून कानाडोळा
येथील अर्धवट कामे पूर्ण करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. पण महापालिका व स्मार्ट सिटीकडून कानाडोळा केला जात आहे. याचा फटका व्यावसायिक आणि नागरिकांना बसत आहे. येथील अर्धवट कामे तातडीने पूर्ण करावीत, अन्यथा रास्ता रोको करू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
समस्यांबद्दल तक्रारी कुणाकडे करायच्या – बाबू पुजारी
स्मार्ट सिटीचे काम अर्धवट असून याचा त्रास रहिवाशांसह व्यावसायिकांना होत आहे. ही कामे तातडीने पूर्ण करा, येथील समस्यांचे निवारण करा, अशी तक्रार स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांकडे केली असता हे काम महापालिकेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिकेच्या अधिकाऱयांना सांगितले असता स्मार्ट सिटीकडे बोट करून जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे समस्यांबद्दल तक्रारी कुणाकडे करायच्या, असा प्रश्न उपस्थित केला. या कॉर्नरला अनेक समस्या भेडसावत असून तातडीने निवारण करण्यात यावे.
समस्यांचे निवारण न केल्यास आंदोलन – शेखर पुजारी
स्मार्ट सिटी आणि महापालिकेचे अधिकारी आपल्या जबाबदाऱया झटकत असल्याने या ठिकाणी समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. दररोज वाहने अडकून पडत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. येथील गटार उघडय़ावर असल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. सीडीचे बांधकाम तातडीने पूर्ण करून समस्यांचे निवारण करण्यात यावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा विचार येथील नागरिकांनी चालविला असल्याची माहिती दिली.