परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱयांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे बस वाहतूक काही दिवस ठप्प झाली. अनेक ठिकाणच्या बसेस बंद झाल्या. त्यामुळे कर्नाटक परिवहन महामंडळ तोटय़ात गेले. असे सांगत आम्हाला वेतन अर्धेच देण्यात आले. आता सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. तेव्हा आम्हाला पूर्ण वेतन द्यावे, या मागणीसाठी कर्नाटक परिवहन मंडळाच्या कर्मचाऱयांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तरी सरकारी व इतर कर्मचाऱयांना पूर्ण वेतन देण्यात आले. मात्र, केएसआरटीसी कर्मचाऱयांना अर्धे वेतन देण्यात आले. या कमी वेतनामध्ये जीवन जगणे कठीण आहे. तेव्हा पूर्ण वेतन द्यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. तातडीने वेतन द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारादेखील यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना आय. एस. मदवाल, एन. आर. देवराज अर्स यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.