विजापूर /प्रतिनिधी .
महाराष्ट्र काही भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे अलमट्टी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढला आहे. धरणाच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे, धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडलं जाऊ शकत. तसेच गुरुवारी धरणाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून धरणाच्या खालच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील कोयना, राधानगरी, राजापूर भागात गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे या धरणांतून सोडण्यात आलेले पाणी अलमट्टी आणि नारायणपुरा धरणात येत आहे. अलमट्टी धरणाची पाण्याची पातळी 516.30 मीटरपर्यंत पोहोचली आहे. या धरणाची जास्तीत जास्त पाण्याची पातळी 519.60 मीटर असून धरणात गुरुवारी 30 हजार क्युसेक पाणी आले आहे.
धरणात नुकतेच ७६.२५२ टीएमसी पाणी साचले आहे. मल्लनाडू भागात पावसामुळे बल्लारी जिल्ह्यातील होसापेटेच्या तुंगभद्र धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. गुरुवारी या धरणात 7 हजार क्युसेक पाणी आले आहे. आता या धरणाची पाण्याची पातळी 1592.36 फूट वर गेली आहे.या धरणाची जास्तीत जास्त पाण्याची पातळी 1633 फूट आहे