ऑनलाईन टीम / मुंबई :
निसर्ग चक्रीवादळ अखेर आज दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास अलिबाग किनारपट्टीवर धडकले. वादळाचा वेग ताशी 120 किमी असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, घरांचे पत्रे उडाले आहेत. या ठिकाणी तैनात असलेल्या NDRF आणि नौदलाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.
अलिबागमध्ये NDRF ची 3 पथके, श्रीवर्धन येथे 2, मुरुड येथे तट रक्षक दलाचे 1 पथक, उरण येथे नागरी सुरक्षा दलाचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. त्या तुकड्यांमार्फत मदतकार्याला वेग आला आहे. अलिबागकडून हे वादळ मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यात प्रवेश करेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.