वस्तीच्या मळणीतील आनंद हरविला : दिवसा मळण्या करण्यावर भर
सुनील राजगोळकर / बेळगाव
तालुक्मयात सर्वत्र सुगी हंगाम जोरात सुरू आहे. त्यामुळे शेतकरी भात जमा करणे, भाताची गंजी घालणे, मळणी करणे असे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर सध्या शिवारात टॅक्टर, ताडपत्र्या आणि मळणी करणारे शेतकरी असे चित्र पहायला मिळत आहे. अलीकडच्या काही वर्षात मळणीच्या कामातून पुरुषांची संख्या कमी झाली असून त्या जागी आता महिलांची संख्या अधिक दिसून येत आहे. दोन दिवस आलेल्या ढगाळ वातावरणामुळे सुगी हंगाम ठप्प झाले होते. मात्र, पुन्हा एकदा शेतकरीवर्ग सुगी हंगामाकडे वळला आहे.
रात्रीच्या होणाऱया मळण्या… मेठीभोवती फिरणारे दहा-पंधरा बैल… मळणी काढण्यासाठी खळय़ात असलेले पुरुष शेतकरी आणि सोबत रात्रीचे चांदणे असे चित्र पूर्वी शिवारात सुगी हंगामात दिसून यायचे. त्यामुळे ग्रामीण भागात सुगी हंगाम म्हणजे एक उत्सवच होता. मात्र, आता हे चित्र कालबाहय़ झाले आहे. पूर्वी मळण्या सर्रास रात्रीच्या व्हायच्या. खळय़ात मेठ रोवून बैलांच्या साहाय्याने मळणी होत होती. ती पद्धत आता नामशेष झाली असून बैलांची जागा ट्रक्टर तर खळय़ाची जागा ताडपत्र्यांनी घेतली आहे. अलीकडच्या काही वर्षात रात्रीच्या मळण्या गायब झाल्या आहेत. त्यामुळे रात्रीच्या मळणीतील आनंदही हरविला असल्याचे मत जाणकार शेतकऱयांतून व्यक्त होत आहे.
रात्रीच्या मळण्या केल्यामुळे दुसऱया दिवशी मळणी केलेल्या भाताला वारे देणेही सोयीस्कर व्हायचे. मात्र आता काळानुसार बदल झाला असून आधुनिक यंत्रसामग्रीमुळे दिवसा मळण्या काढण्याकडे शेतकऱयांचा कला वाढला आहे. सध्या पुरुष मजुरांच्या तुटवडय़ामुळे दिवसा होणाऱया मळणी कामात पुरुषांपेक्षा महिला मजुरांची संख्या अधिक दिसून येत आहे. सध्या मळणीच्या खळय़ावर एखादा ट्रक्टर आणि दहा-पंधरा महिला मळणी काढताना दिसत आहेत…
तालुक्मयातील काकती, होनगा, हंदिगनूर, बंबरगे, अलतगे, कंग्राळी बुद्रुक, गौंडवाड, कडोली, उचगाव, बेकिनकेरे, अतिवाड, बसुर्ते, आंबेवाडी, मण्णूर, बेळगुंदी, बडस, बिजगर्णी, कल्लेहोळ, तुरमुरी, कुदेमनी, बाची, मंडोळी, सावगाव, येळ्ळूर, धामणे, हलगा, तारीहाळ, सांबरा, निलजी, मुतगा आदी भागात सुगी हंगामात शेतकरी मग्न असल्याचे दिसत आहे. तालुक्मयातील सर्वच भागात सुगी हंगामात पुरुषांपेक्षा महिलाच अधिक असल्याचे दिसून येत आहे.
अलीकडे सुगी हंगामासाठी यंत्रांचा वापर वाढला आहे. भात कापणी, भात मळणी व भात वारे देण्यासाठी यंत्रांचा वापर केला जात आहे. यामुळे श्रम व वेळेची बचत होत असली तरी आर्थिक खर्च वाढला आहे. मजूर तुटवडय़ावर उपाय म्हणून आधुनिक यंत्राचा वापर वाढला असला तरी लहान शेतकऱयांना हा खर्च न परवडणारा आहे.
सध्या एका मळणीसाठी टॅक्टर मालकांकडून 500 ते 600 रुपये भाडे आकारले जात आहे. त्यामुळे ट्रक्टर भाडे, मजुरांचा खर्च आणि मळणीसाठी गोडधोड जेवण यामुळे मळणीचा खर्च वाढला आहे. तालुक्यात पारंपरिक दोडगा, बासमती यासह सुधारित इंद्रायणी, सोनम, शुभांगी, अमन, मनिला आदी जातींच्या भात पिकांचे उत्पादन घेतले जाते. गेल्या काही वर्षात एकरी भात उत्पादनात वाढ झाली असली तरी खर्चदेखील दुप्पट वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत.
रेणुका यळ्ळूरकर (महिला शेतकरी)
सुगी हंगाम साधण्यासाठी मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळाची गरज असते. मात्र दिवसेंदिवस सुगी हंगामातील मळणीच्या कामातून पुरुषांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे मुजरांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे महिला मजूर घेऊन किंवा महिला एकत्रित येऊन सुगी हंगाम साधत आहेत. अलीकडे दिवसाच्या मळण्या केल्या जात आहेत. मळणी कामातून पुरुषांची संख्या कमी झाल्याने महिला मजुरांना घेऊन मळणी करावी लागत आहे.
कल्लाप्पा सावंत (शेतकरी)
पूर्वी मळणी म्हटली की सर्व जण एकत्रित येऊन मोठय़ा उत्साहात काम केले जायचे. मळणीसाठी आलेल्या लोकांना गोड व तिखट जेवणाची क्यवस्था केली जायची. त्याबरोबर रात्रीच्या मळणीसाठी सर्व पुरुष असायचे. मात्र, अलीकडे दिवसा मळण्या होत आहेत. पुरुषांची मळणी कामातील संख्या कमी झाल्याने मळणीच्या खळय़ात अलीकडे महिलाच दिसत आहेत.