तीन वर्ष सश्रम कारावास, 16 हजाराचा दंड
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरालगतच्या भाटय़े येथे 13 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱया तरूणाला न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास व 16 हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावल़ी तजमुल जैनुद्दीन भाटकर (33, ऱा भाटये रत्नागिरी) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आह़े
विशेष पॉक्सो न्यायाधीश व्ह़ि ए राऊत यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा सरकारी पक्षाच्यावतीने ऍड़ मेघना नलावडे यांनी काम पाहिल़े न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रानुसार 13 वर्षीय पिडीत मुलगी ही 9 ऑगस्ट 2020 रोजी आपल्या बहिणीला क्लासवरून आणण्यासाठी रस्त्याने जात होत़ी यावेळी पिडीता ही रस्त्याने एकटी जात असल्याचा फायदा उठवत आरोपी तजमुल याने तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केल़ा
याप्रकरणी पिडीत मुलीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होत़ी त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी याच्याविरूद्ध भादवि कलम 354 (अ) व बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम (8) व (12) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक मुक्ता भोसले यांनी गुह्याचा तपास करून आरोपीविरूद्ध दोषारोपपत्र न्यायालयापुढे दाखल केले होत़े
खटल्यादरम्यान सरकारी पक्षाकडून एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आल़े न्यायालयाने जतमुल याला दोषी मानून 3 वर्ष सश्रम कारावास व 16 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावल़ी सरकारी पक्षातर्फे पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनाली शिंदे यांनी काम पाहिल़े