सहय़ाद्री पट्टय़ातील गावांत वादळी वारेः शासकीय यंत्रणा मात्र सुशेगात
वार्ताहर / वैभववाडी:
तालुक्मयामध्ये गेले चार दिवस सुरू असणारा अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱयांमुळे काजू व आंबा बागायतदारांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊनही प्रशासकीय यंत्रणा सुशेगाद असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेले चार दिवस सहय़ाद्रीच्या पट्टय़ातील गावांमध्ये जोरदार वादळी वारे घोंघावत आहेत.
वैभववाडी तालुक्मयात 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस व गारपीट पडल्या. तसेच वादळी वाऱयामुळे सह्याद्रीच्या पट्टय़ातील कुर्ली, सडुरे, शिराळे, नावळे, सांगुळवाडी, भुईबावडा या गावांसह तालुक्मयातील अनेक गावांमध्ये काजू बी व आलेला मोहर सोसाटय़ाच्या वाऱयामुळे जमिनीवर पडून मोठे नुकसान झाले. काही परिसरात तर जोरदार गारपीट झाल्याने मोठय़ा प्रमाणात काजू बी जमिनीवर पडल्या आहेत. तर काजूच्या पानांवर गारपीट झाल्याने पानांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक बागांमध्ये हापूस आंब्याची छोटी फळे व मोहर जमीनदोस्त झाला आहे. काजूचा अपरिपक्व बियांचा खच बागांमध्ये पडलेला दिसत आहे. असे असताना तालुक्मयातील एकाही शेतकऱयाच्या नुकसानीचा पंचनामा तलाठी किंवा कृषीसेवक यांनी केलेला नाही. गुरुवारपासून सलग तीन दिवस शासकीय सुट्टी असल्याने सर्व कार्यालयीन कामकाज बंद आहे. सह्याद्रीच्या पट्टय़ातील काही गावांमध्ये घरांची कौले व पत्रे वाऱयामुळे फुटले आहेत. या नुकसानीचे पंचनामे होणे गरजेचे आहे.
तातडीने पंचनामा करा! जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये काजूचा हंगाम असतो. या हंगामाच्या सुरुवातीलाच अस्मानी संकट शेतकऱयांवर कोसळल्याने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. तालुक्मयातील शेतकरी काजू पिकाकडे हमखास उत्पादन देणारे नगदी पीक समजतात. मात्र, अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. काजू, आंबा व अन्य बागायती तसेच घरांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. mestamp