जिल्हय़ात अनेक ठिकाणी गारांचा तुफान पाऊस
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ाच्या काही भागात बुधवारी सायंकाळच्या दरम्यान अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकुळ घातला आहे. जिल्हय़ाच्या कित्तेक भागात गारांसह वादळी पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. त्यामुळे शेतीपिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. विषेशतः फळ बागायतदार शेतकऱयांचे आतोनात नुकसान झाले आहे. मुख्यतः वाठार स्टेशन, वडूज व फलटन आदी भागात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद आहे.
काही ठिकाणी तर गारांचा खच पडला होता, त्यामुळे हे काश्मिर आहे की सातारा याची ओळख पटणे मुश्किल झाले होते. हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज अगदी खरा ठरला आहे. बुधवारी ही अगदी सकाळ पासुनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत होती.
सातारा शहरात पाऊस सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, म्हणावा तसा पाऊस पडला नाही. पण जिल्हय़ाच्या इतर भागात मात्र पावसाने चांगलाच धुमाकुळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासुन या वातावरण बदलामुळे हवामानात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे एप्रिला हा अगदी उकाडय़ाचा महिना म्हणण्याची संकल्पनाच फेल ठरली आहे.
याचबरोबर गेल्या अठवडय़ाभरापासुन जिल्हय़ाच्या कित्तेक भागात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. पण कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार मागील आठवडय़ात झालेल्या पावसाने कोणत्याच भागातील शेतीपिकांचे नुकसान झाले नाही. त्यामुळे शेतकऱयांनी आता दाद तरी कोणाकडे मागायची असा प्रश्न त्यांच्या पुढे पडला आहे. कारण लॉकडाऊन मुळे आधिच त्यांच्या शेतीमालाचे अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे.
तुटपुंजी नुकसान भरपाई
कृषी विभागातर्फे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱयांच्या शेतीमालची व संबंधीत विभागाची पहानी करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात येते. पण ही देण्यात येणारी नुकसान भरपाई ही अत्यंत तुटपुंजी असते. तसेच काही वेळा तर ही नुकसान भरपाई संबंधीत शेतकऱयांच्या खात्यात जमा होण्यास ही अधिक विलंब लागतो.
शेतकऱयांचे सर्वाधिक नुकसान
अवकाळी पाऊस आणि गारांमुळे शेतकऱयांच्या शेतीपिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. कित्तेकांच्या शेतात तर गारांचा चांगलाच थर साचला होता. मुख्यतः आंबा, दाक्षे, स्ट्रॉबेरी, कलिंगड, उत्पादकांवर याचा मोठा फटका बसणार आहे. त्याचबरोबर कांदा उत्पादन, सोयाबीन, गहु, हरभोरा कापणी सुरू आहे. यावर ही याचा मोठ्ठा फटका बसला आहे.