प्रतिनिधी / बेळगाव
सिमेंटच्या जंगलात चिऊताई हरवत चालली आहे. त्यांचा किलबिलाट पुन्हा ऐकण्यासाठी नागरिकांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत पक्षीप्रेमी व जायंट्स मेनचे पदाधिकारी अविनाश पाटील यांनी व्यक्त केले.
आगरकर रोड, टिळकवाडी येथील रहिवासी असलेले पाटील 10 वर्षांपासून गोखले अपार्टमेंटमधील आपल्या फ्लॅटच्या गॅलरीत पक्ष्यांसाठी खाद्य आणि पाणी ठेवत आहेत. दररोज तेथे वेगवेगळे पक्षी येत असतात. ते भटक्मया कुत्र्यांसाठी आणि मांजरांसाठीसुद्धा खाद्य आणि पाणी देत असतात. जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा चिमण्यांचा किलबिलाट ऐकण्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा. अन्यथा, पुढच्या पिढीला पुस्तकांतूनच एक होती चिऊताई असे सांगण्याची वेळ येईल. ती येऊ नये यासाठी प्रत्येकानेच आपल्या गच्चीवर पक्ष्यांसाठी खायला दाणे आणि पिण्यासाठी पाणी ठेवण्याचा संकल्प करावा, असे ते म्हणाले.