ओटवणे/ प्रतिनिधी-
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून असनिये गावातील युवकांनी एकत्र येत असनिये – तांबोळी रस्त्याची श्रमदानातून साफसफाई केली. युवकांच्या या उपक्रमाचे असनिये व तांबोळी परिसरातून कौतुक होत आहे. असनिये – तांबोळी या मार्गावर सध्या पावसाळयात मोठया प्रमाणात झाडी – झुडपे वाढल्याने वाहनचालकांना याचा फटका बसत होता. मूळात हा रस्ता अरुंद असून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे अनेक वेळा लहानसहान अपघात होते. त्यामुळे वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. यावेळी रस्त्याच्या साईडपट्टी भागाचीही स्वछता करण्यात आली. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या दुर्लक्षित रस्त्याची साफसफाई केल्याबद्दल वाहन चालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी पोलीस पाटील विनायक कोळापटे, गोटया सावंत, दीपक सावंत, भिकाजी नाईक, बाबुराव सावंत, राकेश सावंत, मेघशाम भिसे, जितेंद्र जाधव, महान सावंत, मुरलीधर ठीकार, शंकर सावंत, राम सावंत, संतोष सावंत, नरेश पेडणेकर, बुधाजी सावंत, दादा सावंत आदीनी या श्रमदानात सहभाग घेतला.