लाखोंचे नुकसान
वार्ताहर / कणकवली:
तालुक्मयातील असलदे येथील वेताळाचा माळ येथील काजू, आंबा बागायतीला सोमवार दुपारी लागलेल्या आगीत शेकडो झाडे जळाली. ऐन हंगामातच आग लागल्याने येथील शेतकऱयांवर संकट कोसळले आहे. या आगीत शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमुळे आंबा व काजूला दर मिळत नसल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत. यातच असलदे येथील वेताळाचा माळ येथे लागलेल्या आगीत शेतकरी दत्तात्रय गंगाराम तांबे, आत्माराम घाडीगावकर, सुनील भागोजी तांबे, अनंत तांबे, बळीराम तांबे यांच्या मालकीची 500 हून अधिक काजू आणि 10 आंबा झाडे जळून झाली खाक झाली. घटनेची माहिती मिळताच कृषी सहाय्यक हेमंत बुधवळे, कोतवाल मिलिंद तांबे, सरपंच गुरुप्रसाद उर्फ पंढरीनाथ वायंगणकर आदींनी पाहणी केली.