रत्नागिरीतून झाले होते 8 हजार कॉल्स , संशयाची सुई कायम
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीतील आंतरराष्ट्रीय कॉल प्रकरणात रत्नागिरी पोलिसांनी एका मोठय़ा मोबाईल कंपनीकडून कॉल्सचा डेटा मागवला आह़े पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या राऊटरमधून सुमारे 8 हजार 513 कॉल करण्यात आल्याचे समोर आले होत़े हे प्रत्येक कॉल्सचे डिटेल पोलिसांनी या इंटरनेट कनेक्शन देणाऱया मोबाईल कंपनीकडून मागवले आहेत़ हे कॉल डिटेल्स प्राप्त झाल्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल़े
शहरातील आठवडा बाजार येथील सायबर पॅफेमधून आंतराष्ट्रीय कॉल केले जात असल्याचा प्रकार 12 ऑगस्ट 2021 रोजी समोर आला होत़ा विशेषतः पाकिस्तानात हे कॉल करण्यात आल्याने पोलिसांच्या यंत्रणा सतर्क झाल्य़ा मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाला या कॉल्सची माहिती मिळताच त्यांनी रत्नागिरी पोलिसांना सूचित केले होत़े
तिसरा आरोपी फरारी
रत्नागिरी पोलिसांकडून कारवाई करत 2 जणांना अटक केल़ी तर 3 जणांविरूद्ध गुन्हा दाखल पेल़ा यामध्ये सायबर पॅफे चालक अलंकार अरविंद विचारे (38, ऱा छत्रपतीनगर रत्नागिरी), फैजलरझा अगिरझा सिद्धीकी (33, ऱा नवी मुंबई) यांना अटक करण्यात आल़ी यातील तिसरा आरोपी अर्शद नवाझ हा फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल़े
शहरात चालणाऱया या सायबर पॅफेबाबत अनेक प्रश्न उपस्थित राहिले होत़े सायबर पॅफे चालवताना जिल्हाधिकाऱयांची परवानगी घेणे बंधनकारक असत़े मात्र परवाना नसतानाही हा सायबर पॅफे बिनबोभाट सुरू होत़ा याची गंभीर दखल तपास यंत्रणांकडून घेण्यात आल़ी शासनाचा महसूल बुडवण्याबरोबरच अशा प्रकारे कॉल्स होणे हे सुरक्षेसाठी आव्हान असल्याने पोलिसांकडून तातडीने कारवाई करत दोघांना ताब्यात घेण्यात आल़े तर दुकानावर जप्तीची कारवाई करण्यात आल़ी
शासनाकडून रितसर परवानगी न घेताही हे सायबर पॅफे चालवले जात आहेत़ त्यामुळे अशाप्रकारे अन्य किती ठिकाणी अवैधरित्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कॉल करण्यात येतात़, याबाबत आता पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आह़े लॅपटॉपवरून करण्यात येणारे हे कॉल सामान्यपणे ट्रेस होत नसल्याने देशविघातक कृत्यांसाठीही याचा वापर होण्याची भीती व्यक्त केली जात आह़े यापूर्वीही रत्नागिरी जिह्यात देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या संशयिताला आश्रय दिल्याचा प्रकार समोर आला होत़ा त्यासाठी राज्याचे दहशतवादविरोधी पथक रत्नागिरीत येऊन चौकशी करून गेले होत़े त्यामुळे रत्नागिरी जिल्हा हा संवेदनशील जिल्हा होण्याकडे वाटचाल करत आहे, अशी शंका उपस्थित करण्यात येत आह़े दरम्यान, आता पोलिसांकडून चौकशीसाठी कॉल डिटेलचा आधार घेण्यात येत आह़े