ऑनलाईन टीम / हैदराबाद :
शेतातील मजुरांना घरी घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरवर विजेची तार पडल्याने 13 मजुरांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील माचावरम भागात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाशम जिल्ह्यातील माचावरम भागातील एका मिरचीच्या शेतात काम करणाऱ्या 30 मजुरांना ट्रॅक्टरमधून घरी सोडण्यात येत होते. दरम्यान, ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरने रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की खांबावरील विजेची तार थेट ट्रॅक्टरवर कोसळली. या दुर्घटनेत ट्रॅक्टरमधील 13 मजुरांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 11 महिलांचा समावेश आहे.