अमरावती
आंधप्रदेशात विधान परिषदेचे अस्तित्व संपुष्टात आणण्यासंबंधीचा प्रस्ताव विधानसभेत संमत करण्यात आला आहे. विधान परिषदेने तीन राजधान्यांचे सूत्र रोखल्यावर मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. पुढील कारवाईसाठी हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
आंध्रप्रदेश मंत्रिमंडळाकडून विधान परिषदेचे अस्तित्व संपुष्टात आणण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर सोमवारी विधानसभेकडूनही संमती मिळाली आहे.
3 राजधान्यांचा प्रस्ताव रोखण्यासाठी विरोधी तेलगू देसम पक्ष विधानसभेतील स्वतःच्या बहुमताचा गैरवापर करत असल्याचा आरोप सत्तारुढ वायएसआर काँग्रेसने केला आहे. जगनमोहन सरकारने उचललेल्या पावलामुळे राज्यात घटनात्मक आदर्श नसल्याचे सिद्ध होते असा आरोप तेदेप खासदार रवींद्र कुमार यांनी केला आहे.