राजापुरातील पत्रकार वारिशेंच्या खूनाचा आरोप
प्रतिनिधी/ रत्नागिरी
राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खूनाचा आरोप असलेल्या पंढरीनाथ आंबेरकर याचा जामीन अर्ज मंगळवारी सत्र न्यायालयाने फेटाळून लावल़ा खून प्रकरणात अटक झाल्यानंतर आंबेरकर याने जामिनासाठी अर्ज दाखल केला होत़ा मंगळवारी या जामीन अर्जावर सुनावणी झाल़ी यावेळी दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आंबेरकर याचा जामीन अर्ज फेटाळून लावल़ा
रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल़ डी. बिले यांनी जामीन अर्जावरील निकाल दिल़ा सरकारी पक्षाकडून ऍड़ अनिरूद्ध फणसेकर यांनी युक्तीवाद केल़ा मुंबई-गोवा महामार्गावरील कोदवली पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर 6 फेबुवारी 2023 रोजी राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिशे यांचा थार गाडीखाली चिरडून मृत्यू झाला होत़ा घटनेच्या दिवशी पोलिसांकडून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा संशयित आरोपीविरूद्ध दाखल केला होत़ा मात्र पोलीस तपासात हा पूर्वनियोजित खून असल्याचे समोर आल़े त्यानुसार पेलिसांनी पंढरीनाथ आंबेरकर याला अटक केली होत़ी
पंढरीनाथ याच्याविरूद्ध भादंवि कलम 302 नुसार राजापूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आल़ा तसेच पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल झाला आह़े अपघातामधील थार गाडी ही पंढरीनाथ आंबेरकर याच्या नावावर असल्याचे दिसत आह़े ही गाडी आंबेरकर याने मे 2022 विकत घेतली होत़ी गाडीमागे आरआरपीसीएल कंपनीचे नाव लिहिलेले असून त्या खाली रिफायनरी समर्थक असे लिहिल्याचे स्पष्टपणे दिसून येत आह़े शशिकांत वारिशे यांच्या खून प्रकरणातील आंबेरकर वापरत असलेली थार गाडी नेमकी कुणाच्या मालकीची, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होत़ा मात्र उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माहितीनुसार थार गाडी पंढरीनाथ याचीच असल्याचे समोर आले आह़े
राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिशे हे राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात लिखाण करत होत़े तर पंढरीनाथ आंबेरकर हा स्वतःला रिफायनरी समर्थक म्हणवून घेत होत़ा वारिशे हे करत असलेल्या लिखाणातूनच वारिशे यांचा काटा काढण्यात आला, असा आरोप नातेवाईक व वारिशे यांच्या मित्रपरिवार व रिफायनरी विरोधकांकडून करण्यात आला आह़े