समस्या सोडविण्याची पीडीआंकडे निवेदनाद्वारे मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
आंबेवाडी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱया महिलांना काम मिळत नसल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात येत होत्या. याचबरोबर उद्योग खात्री योजनेतून इतर समस्या सोडविण्याकडे ग्राम पंचायतीने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे सोमवारी श्रमिक विकास संघातर्फे मोर्चा काढण्यात आला. ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱया मण्णूर गावातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामावर जाणाऱया महिलांही यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे बसवंत कोले, सुधीर काकतकर, ज्ञानेश्वर पाटील, विठ्ठल देसाई व राहुल पाटील यांनी केले होते. सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी पीडीओ इंदिरा गाणगेर व अभियंते अक्षय चव्हाण यांनी मोर्चेकऱयांना सामोरे जात निवेदन स्वीकारले. त्यानंतर दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ आंबेवाडी हायस्कूलच्या पटांगणात महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी लक्ष्मी होनगेकर, सुरेखा मंडोळकर, यशोदा गोविंदाचे, उर्मिला काकतकर, ग्राम पंचायत सदस्या जयश्री तोरे या गटप्रमुखांनी मण्णूर येथील महिलांतर्फे तक्रारी मांडल्या. लक्ष्मी कदम, रेखा तरळे, मालू शहापूरकर, उर्मिला चौगुले, सविता चौगुले, मालू मंडोळकर, सुनिता काकतकर, रेखा पाटीलसह मण्णूर येथील महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. यावेळी महिलांना मार्गदर्शन केले.