प्रतिनिधी / सांखळी
सांखळी मतदार संघातील सीमा भागात असलेल्या आंबेशी गावाला जोडणाऱया पुलाला धोका निर्माण झाला आहे मासेमारीसाठी लोक झिलेटिन स्फोटक चा वापर करतात असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे अश्या प्रकारामुळे कांही घरानाही धोका निर्माण झाला आहे तेव्हा या कडे सरकारने विशेष लक्ष द्यावे अशी मागणी आंबेशी गावातून होत आहे
बेकायदेशीर मासेमारी करणाऱयावर कारवाई हवीङ
झिलेटिन स्फोटक वापरून बेकायदेशीर नदीच्या पात्रात मासेमारी करणाऱया कारवाई करावीच तसेच ही स्फोटके सामान्य नागरिकांना कुठे उपलब्ध होतात याचीही तपासणी होणे आवश्यक आहे , राज्यात लोकडाऊन मुळे आधी अनेक समस्या ना समोर जाणाऱया आंबेशी वासियाची हे प्रकार डोकेदुखी ठरले आहे, तसेच घरांचेही नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे रविवारी अशा प्रकाराेना उत येत आहे
तेव्हा पोलिस गस्त या भागात असायला हवी असे स्थानिक सांगतात
निसर्ग आणि सरकारव मोठ नुकसान
नदीच्या पात्रात झिलेटिन स्फोट घडवून आणल्यावर आपोआप निसर्गाची हानी होते खडप ( दगड ) फुडतात ,मास्याना त्रास होतो स्थानिक लोकांना ही या मुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच सरकारने कोटय़वधी रुपये खर्च करून बांधलेल्या पुलाला धोका निर्माण झाल्याने या प्रकारामुळे सरकारला ही मोठे नुकसान होण्याची शक्मयता ही वर्तवली जात आहे, स्थानिक लोकांच्या घरानाही भेगा पडल्याने याकडे प्रशासनाने गामभियाने पाहणी करवी अशी मागणी होत आहे.