सावंतवाडी / प्रतिनिधी-
वेंगुर्ले बेळगाव मार्गावरील आंबोली घाट मार्ग मोठी दरड कोसळण्याचा धोका आहे, त्यामुळे या घाटातील गटारे साफ करणे आवश्यक आहे. मुख्य धबधब्याजवळ वर्षभरापूर्वी बांधण्यात आलेल्या मोरीच्या बांधकामामुळे येथील भली मोठी दरड धोकादायक झाली आहे. त्यामुळे ती पडण्याची दाट शक्यता आहे, असे निवेदन माजी आमदार शिवराम दळवी यांनी सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंता श्रीकांत माने यांच्याकडे दिले असून त्यांनी आंबोली घाट मार्गात धोक्याबाबत लक्ष वेधले आहे. या निवेदनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना या घाट मार्गाबाबत ची कल्पना आहे.