वार्ताहर / आंबोली:
आंबोली-बेळगाव महामार्गावर चंदगड फाटकवाडी येथे रस्त्यावर भलेमोठे झाड पडल्याने गेले आठ दिवस वाहतूक बंद असून सिंधुदुर्गचा बेळगावशी संपर्क तुटला आहे. बेळगावचा 70 किमीचा प्रवास 140 किमीचा फेरा मारुन करावा लागत आहे.
बेळगाव रोडवर सिंधुदुर्ग जिल्हय़ाची सीमा सोडल्यावर कोल्हापूरच्या सीमेत फाटकवाडी येथे येथील ग्रामस्थांनी भलेमोठे झाड रस्त्यावर तोडून घातले आहे. त्यावर जेसीबीने माती टाकल्याने चारचाकी सोडाच दुचाकीही जाणे कठीण झाले आहे. चार दिवसांपूर्वी चंदगड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परंतु झाड कोणी पाडले? याबाबत माहिती मिळू शकली नाही.
भाजी वाहतूक, जीवनावश्यक वस्तू, ऍम्ब्युलन्स आदीची वाहतूक याच मार्गावरून केली जाते. परंतु बेळगावला जायचे असेल तर सद्यस्थितीत आंबोली, आजरा, नेसरीमार्गे जावे लागते.