… पहिला भाग
बुध. दि. 10 ते 16 जून 2020
रविवार दि. 21 जूनरोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होत आहे. मिथुन रास व मृग नक्षत्रात होणारे हे ग्रहण अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे. गेल्या 2019 वर्षअखेरीस लागोपाठ झालेल्या ग्रहणांनी कोरोनाला जन्म दिला. यावेळीही तशीच स्थिती आहे. त्यामुळे पुढे काय वाढून ठेवले आहे हे त्या निसर्गालाच माहीत. ग्रहण किती काळ टिकते व त्या काळात किती अंशापासून किती अंश झाले व प्रत्येक अंशावर ग्रहणाचा काय परिणाम होतो. याबाबतची सविस्तर माहिती ऍलन लिओ या जुन्या इंग्लिश ज्योतिषकाराने एका इंग्लीश पुस्तकात दिलेली आहे पण त्या पुस्तकाचे नाव आठवत नाही. राहू, चंद्रास ग्रासतो व केतू सूर्यास ग्रासतो व त्यामुळे ग्रहणे होतात ही केवळ कवीकल्पना आहे. पृथ्वीवरील लोकांच्या बऱया वाईट आचरणाचा व आकाशातील ग्रहणाचा काही एक संबंध नाही. प्रत्येक 18 वर्षे 10 दिवसाच्या काळात 71 ग्रहणे होतात, त्यातील 42 सूर्यग्रहणे असतात व 29 चंद्रग्रहणे असतात पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी त्यातील 7 सूर्यग्रहणे व 14 चंद्रग्रहणे दिसू शकतात. ग्रहण लागण्यापूर्वी त्याचा वेध लागतो. सूर्याचा पुरेसा प्रकाश न पडल्यामुळे हवा दूषित होऊन त्या योगाने पचनादी क्रिया बिघडतात त्यामुळे रोग पसरतात त्यासाठीच ग्रहणापूर्वी काही काळापर्यंत भोजन करू नये, असा नियम आहे वेध लागल्यापासून ग्रहण सुटेपर्यंत भोजन वगैरे करू नये याला वैज्ञानिक कारण आहे. ज्या राशीना ग्रहण अनिष्ट असते त्यांनी ते पाहू नये म्हणजे काहीही त्रास होत नाही. सूर्य स्वयंप्रकाशी असल्याने वस्तूत त्याला ग्रहण लागत नाही. पण अमावास्येला सूर्याच्या आड चंद्र आल्याने त्याची छाया पृथ्वीवर पडते. त्यामुळे चंद्राच्या पलीकडील सूर्याचे प्रकाश आंधुक होतो त्यालाच सूर्यास ग्रहण लागले असे म्हणतात, ज्या नक्षत्रात व राशीत ग्रहण होते, त्याच्यावर या ग्रहणांचा तीव्र परीणाम होतो, त्यासाठी जप करावा. अमुक दान तमुक दान यांच्या मागे लागू नये. ग्रहणात केलेले श्राद्ध हे पृथ्वीदानाइतके पुण्यफल प्राप्त करून देते. ग्रहणात कोणकोणती कृत्ये करावीत अथवा करू नयेत त्याचा वेधकाळ ग्रहण स्पर्शकाळ व त्याचे महत्त्व पथ्यपाणी वगैरे माहिती सर्व पंचांगात दिलेली असते. त्यानुसार कसे वागावे याचा निर्णय घेता येतो. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण व कालसर्पयोग यांचा फार जवळचा संबंध आहे. शापीत योग निर्माण होतात हे सूर्यग्रहणही कालसर्पयोग घेऊनच आलेले आहे, आपल्या हातून घडणारी बरी-वाईट कृत्येच शापीत स्वरुपात दृगोच्चर होतात. या जन्मात अथवा पुढील जन्मात ती भोगावी लागतात. कुंडली चांगली असते, माणूस सरळ मार्गाने जात असतो, तरीही त्याला यश मिळत नाही, नोकऱया मिळत नाहीत, लग्नात अडथळे प्रकृतीच्या तक्रारी क्षणार्धात होत्याचे नव्हते होणे, बदनामी एखाद्याला मदत केलेली असेल पण तीच क्यक्ती नंतर त्याची जाण ठेवत नाही, पैसे बुडतात किंवा कोणत्या तरी मार्गाने फसवणूक तरी होती, यासह अनेक शापीत दोष पत्रिकेत दिसतात, ते ग्रहणामुळेच. फक्त चंद्र-सूर्यालाच ग्रहण लागते, असे नसते तर सर्व ग्रहांना राहू केतूचे ग्रहण लागते व कालसर्पयोगाच्या वेगवेगळय़ा रुपात ते पत्रिकेत दिसते.
मेष
दक्षिणायनाच्या तोंडावरील 21 तारखेचे सूर्यग्रहण तुम्हाला सर्व बाबतीत चांगले फळ देणारे आहे. सुखसमृद्धी, धनलाभ यांचा लाभ होईल, पण त्याचबरोबर एखाद्या पूर्वीच्या प्रकरणी चौकशी करणारा सरकारी ससेमिराही मागे लागेल. प्रवास अथवा कोणतेही काम करताना कुणाची वाईट नजर पडणार नाही यासाठी जपावे.
वृषभ
सूर्यग्रहण आर्थिक बाबीवर अनिष्ट परिणाम करण्याची शक्मयता आहे. त्यामुळे आगामी काळात कोठेही गुंतवणूक करताना डोळय़ात तेल घालून काळजी घ्यावी. शापीत योग. काही जबाबदाऱया पडतील. मनात नसतानाही त्या स्वीकाराव्या लागतील. डोळय़ांची काळजी घ्यावी. कुणी काही खाण्यापिण्यास दिल्यास ग्रहण काळात ते टाळावे.
मिथुन
21 तारखेला तुमच्या राशीत होणारे सूर्यग्रहण आरोग्याच्या बाबतीत त्रासदायक ठरेल. मानसिक ताणतणावही वाढतील तुमची काहीही चूक नसताना इतरांची बोलणे खाण्याचे प्रसंग येतील पण सावध राहून येणाऱया प्रसंगाला तोंड द्या. सासू, सून वादाला तोड फुटण्याची शक्मयता. सांभाळावे. वैवाहिक जीवनात सामंजस्य राखावे लागेल.
कर्क
अनिष्ट स्थानी होणारे 21 तारखेचे सूर्यग्रहण त्रासदायक आहे. त्यासाठी सर्व बाबतीत सांभाळावे. गुप्तशत्रुंच्या कारवाया वाढतील. करणीबाधा विषप्रयोग यांची शक्मयता राहील. निष्कारण काहीजण तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतील पण सावधगिरी बाळगलात तर हेच ग्रहण तुम्हाला दैवी शक्तीची कृपाही मिळवून देईल.
सिंह
21 जूनचे सूर्यग्रहण तुम्हाला सर्व बाबतीत लाभदायक ठरेल. आर्थिकदृष्टय़ा मोठमोठे लाभ होतील. सायकलने हिंडत असाल तर कारगाडीतून फिरण्याचे योग येतील. मित्रमंडळी अनेक बाबतीत सहाय्यक करतील. घरादारासाठी प्रयत्न केला असाल तर हमखास यश. संततीच्या बाबतीत मात्र जरा काळजी घ्यावी लागेल.
कन्या
नोकरी व्यवसायात अत्यंत महत्त्वाच्या शुभ घटना घडतील. 21 जूनचे सूर्यग्रहण सर्व कामासाठी यशोवर्धक आहे. रहाती वास्तू आई व सासू यांच्या बाबतीत मात्र जरा अडचणीचे प्रसंग तसेच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल. परदेश प्रवासाच्या प्रतीक्षेत असाल तर हे ग्रहण तुम्हाला निश्चितच अनुकुलता प्रदान करील.
तुळ
21 जूनचे सूर्यग्रहण संमिश्र फळ देईल. प्रवासात त्रास धोका, फसवणूक, अपघात, पैसे व मौल्यवान वस्तू हरविणे यासारख्या घटना घडतील पण बाकीचे ग्रहमान चांगले असल्याने आतापर्यंत ज्यांना मदत केली ते लोक आपणहून तुम्हाला मदतीचे हात पुढे करतील. जर तुम्हाला कोणतेही व्यसन नसेल धार्मिक असाल तर मोठय़ा कामात यश देणारा आहे.
वृश्चिक
21 तारखेचे सूर्यग्रहण अष्टमस्थानी होत आहे. अपघात, आजार, बाधिक पीडा, शापीत योगाचा परिणाम या दृष्टीने हे त्रासदायक आहे. कोणतेही आर्थिक व्यवहार जपून करावेत. वाहन जपून चालवा. बाधिक ठिकाणी जाणे कटाक्षाने टाळा तसेच कोरोनासारख्या व्यक्तींपासून सावध राहिल्यास या ग्रहणाचा काही त्रास होणार नाही.
धनु
21 जूनला होणारे सूर्यग्रहण वैवाहिक जीवनात काही तरी गोंधळ माजविण्याची शक्मयता आहे. कुणाही परकीय व्यक्तीला आपल्या मनातील गुप्त गोष्टी अथवा गूढ गोष्टी सांगू नका तयाचा गैरवापर होऊन संसार बिघडण्याची शक्मयता आहे. भागिदारी व्यवसायातील आर्थिक घोटाळे उघडकीस येतील. हे ग्रहण शुभ फलदायक नाही. त्यामुळे काळजीपूर्वक वागा. महिनाभर त्याचा प्रभाव जाणवेल.
मकर
21 जूनचे सुर्यग्रहण तुम्हाला धनलाभ व सर्व कामात मोठे यश देणारे आहे. लक्ष्मीची कृपा लाभून देणारे असल्याने आतापर्यंत अडकलेल्या कामात यश मिळेल. पण त्याचबरोबर रिपुस्थानी होत असल्याने शत्रुपीडा निर्माण करणारे आहे. त्यामुळे जरा सावध रहावे, वैयक्तिक गोष्टी मित्रमंडळी अथवा नातेवाईकांना सांगू नका. चेष्टा मस्करीत कुणीतरी त्याचा दुरुपयोग करू शकतील.
कुंभ
दक्षिणायणाच्या तोंडावरील 21 जुनचे सूर्यग्रहण संततीच्या बाबतीत त्रासदायक आहे. मुलांच्या वागण्यात अनपेक्षित फरक जाणवेल. किरकोळ चुका अथवा काही प्रसंगामुळे घरातील वातावरण जरा गढूळ होण्याची शक्मयता आहे. एखादे मोठे काम होण्याची शक्मयता असताना अचानक त्यात अडचणी येतील व काळ महिनाभर राहील.
मीन
दक्षिणायनाच्या तोंडावरील सूर्यग्रहण कौटुंबिक सौख्याच्या बाबतीत चांगले नाही. प्रखर वास्तुदोष निर्माण करणारे ग्रहमान आहे. त्यासाठी शांती वगैरे मागे न लागता कुलदेवता पूजन व स्वच्छतेला प्राधान्य द्या. नोकरी व्यवसायात कुणाचे मन दुखविले जाणार नाही, याची काळजी घ्या. इतरांना लीफ्ट देण्याचे टाळा. अन्यथा नको ते प्रसंग घडतील.