महाराष्ट्रात दौऱयाला उदंड प्रतिसाद, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची माहिती
प्रतिनिधी /पेडणे
देशातील भाजपचे सरकार सक्षम असून याही पुढे देशात भाजपचेच सरकार येणार आहे शिवाय महाराष्ट्र राज्यात जो दौऱयावेळी उदंड प्रतिसाद मिळतो त्यावरून राज्यात भाजपचे सरकार येईल असा विश्वास केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी हणखणे पेडणे येथे स्थानिक पत्रकारांकडे बोलताना व्यक्त केला.
केंद्रीयमंत्री पूर्ण महाराष्ट्र राज्य दौऱयावर जनसंपर्क मोहिमेच्या अतर्गत 29 रोजी मंत्री राणे दोडामार्ग येथे दौरा केल्यानंतर हणखणे, पेडणे नईबाग मार्गे सातार्डा दौऱयावर जात असताना हणखणे येथे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर व भाजपा समर्थकानी त्यांचे जोरदार स्वागत केले.
यावेळी मोठय़ा संख्येने वाहने केंद्रीयमंत्री नारायण राणे याच्या दिमतीला उपस्थित होती . हणखणे येथे तीन वाजल्यापासून भाजपचे कार्यकर्त्ये उपस्थित होते. चार वाजता मंत्री नारायण राणे येणार होते ते साडे पाच वाजता पोचले तरीही लोकांच्या उत्साह कायम होता. स्वागतासाठी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, पेडणेचे उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर, तोरसे जिल्हा पंचायत सदस्य सीमा खडपे, धारगळ जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर, पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस, चंदेल सरपंच संतोष मळिक, माजी सरपंच सुर्यकांत तोरस्कर, नारायण तळकटकर, माजी सरपंच मंदार परब, प्रदीप कांबळी,संदीप नाईक, रामा सावळ देसाई, आदी उपस्थित होते.
मंत्री नारायण राणे हे हणखणे येते पोचताच जल्लोषाने त्याचे स्वागत केले. वाहनाकडून 10 मीटरपर्यंत ते सुरक्षारक्षकांच्या गराडय़ातून चालत आले. महिलांनी आरती ओवाळून व पुष्पा?जली वाहून जोरदार स्वागत केले. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्वागत केले. उपस्थितांचे स्वागत स्वीकारून केंद्रीयमंत्री लगेच आपल्या वाहनाकडे रवाना झाले, वाहनात बसतानाच प्रतिनिधीने त्याना प्रश्न विचारले , दौऱयाचे प्रायोजन काय ,त्यावर उत्तर देताना केंद्र सरकारच्या ज्या ज्या योजना तळागाळातील नागरिकापर्यंत पोचाव्यात, त्या पोचतात कि नाही, काही अडचणी समस्या आहेत का, शिवाय आपल्याकडे जी प्रतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जबाबदारी दिली. त्यासाठी आपल्याला महाराष्ट्र जनतेकडून आशीर्वाद घेण्यासाठी आपण पूर्ण महाराष्ट्र राज्याचा दौरा करत आहे या दौऱयात आपणास उदंड प्रतिसाद मिळत असल्याने आगामी काळातही देशात आणि प्रत्येक राज्यात भाजपचे सरकार येईल असा विश्व व्यक्त केला.
आगामी काळात भाजपचेच सरकार : उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बोलताना केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांचा सहभाग झाल्यानंतर त्यांनी धावत्या दौऱयात आमच्या पेडणे मतदार संघातील हणखणे या भागात आल्यानंतर आम्ही त्यांचे जय्यत स्वागत केले. नारायण राणे सारख्या नेत्यांची राज्यात गरज असल्याचे सांगितले. आगामी काळातही भाजपचेच सरकार येणार असे बाबू आजगावकर यांनी विश्वास व्यक्त करून मोठय़ा संखेने कार्यकर्त्ये उपस्थित होते म्हणून त्यांनी सर्वांचे आभार मानले.
सामाजिक अंतर कुणासाठी? पत्रकारांचा प्रश्न
एका बाजूने मोठय़ा प्रमाणात कोरोना महामारी आहे, आणि सरकारने सामाजिक अंतर राखण्यासाठी नियम केले आहे. हे नियम सर्वसामान्य नागरिकाना आहे का असा सवाल करून राजकीय नेत्यांच्या स्वागतासाठी शेकडो नागरिक कोणतेच शाररीक अंतर न ठेवता गर्दी केली जाते . हा कायदा सर्वसामान्याना सरकार लागू होत नाही हा असा सवाल उपस्थित केला असता, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी उत्तर देताना कोरोना महामारी नियंत्रणात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहे. ज्यांनी दोन डोस घेतले नाही त्यांनी ते घ्यावेत . या वेळी ज्यांनी दोन डोस घेतले तेच नागरिक उपस्थित होते असा दावा केला.