आचरा ग्रामस्थच करणार गावाच्या सीमा बंद
प्रतिनिधी / आचरा:
आचरा गावात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी आचरा गावात सात दिवसांचा लाँकडाउन करण्याचा निर्णय सोमवारी आचरा सरपंच प्रणया टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्कालीन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 9 जून ते 16 जून सकाळी 7 वाजेपर्यंत गावच्या सीमा होणार बंद राहणार आहेत. यावेळी बाहेरील गावातील लोकांना गावात प्रवेश बंद करण्यात आला असून गावच्या सीमा बंद करण्यासाठी सीमेवर स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत.
आचरा गावच्या आपत्कालीन समीतीची बैठकित ग्रामपंचायत आचराच्या सभागृहात यावेळी जिल्हा परिषद सदस्य जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, नीधी मुणगेकर, मंगेश टेमकर, माजी सरपंच राजन गांवकर,डॉ प्रमोद कोळंबकर, निलेश सरजोशी, जगदीश पांगे, अनिल करंजे, जयप्रकाश परुळेकर, परेश सावंत, अभय भोसले, ग्रामविकास अधिकारी गणेश परब, बँक अधिकारी, तलाठी यांसह समितीचे सर्व सदस्य आदी उपस्थित होते.