तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱयांचे पीडीओंना आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
निवडणूक आयोगाने ग्राम पंचायत निवडणुका जाहीर केल्या आहेत. निवडणुका जाहीर करण्याबरोबरच आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. तेंव्हा कोणत्याही ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असेल तर त्वरित कारवाई करावी, असे आवाहन तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी केले आहे.
तालुका पंचायत कार्यालयात त्यांनी पीडीओंची बैठक घेतली. यावेळी त्यांनी वरील आवाहन केले. निवडणूक आयोगाने दि. 22 व 27 डिसेंबर रोजी अशा दोन टप्प्यात निवडणुका घेण्याचे जाहीर केले आहे. सध्या अजून उमेदवारी अर्ज करण्यास प्रारंभ नसला तरी अनेक ठिकाणी ओल्यापाटर्य़ा व इतर साहित्याचे वितरण करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांनी अशा घटनांवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत अवैद्य काम करणाऱयांच्या मुसक्मया आवळण्यासाठी प्रयत्न करा, असेही सांगण्यात आले.
57 ग्राम पंचायतीमध्ये होणार निवडणुका
बेळगाव तालुक्मयातील 57 ग्राम पंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत. यावेळी अनेकजण इच्छुक आहेत. तर काही बडय़ांनी आतापासून पाटर्य़ा व पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू केल्याची माहिती आहे. अशांवर कडक कारवाई करण्यासाठी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात हालचलींवर लक्ष ठेवून संबंधित खात्याला सांगणे गरजेचे आहे. या आचारसंहितेमधून दुष्काळाबाबतची कामे करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते, पाणी, समस्या यासाठी अधिकाऱयांनी प्रयत्न करावे लागणार आहेत, असेही सांगण्यात आले.
ग्राम पंचायत निवडणुका या आता राष्ट्रीय पक्षाच्या निवडणूक चिन्हावर लढविता येणार नाहीत. याचबरोबर कोणत्याही नेत्याचे किंवा संघटनेच्या प्रमुखाचे छायाचित्र देखील प्रसिद्ध करता येणार नाही. तसे दिसल्यास तातडीने कारवाई करावी. आचारसंहिता घोषित झाल्यामुळे आता लोकप्रतिनिधी व विविध संघटनांना आणि अधिकाऱयांना कोणत्याही सार्वजनिक कामामध्ये भाग घेता येणार नाही. मात्र जिल्हा पंचायत, तालुका पंचायत बैठका घेण्यास मुभा असल्याचेही ते म्हणाले.
नवीन कोणताही प्रकल्प किवा योजना राबविण्यासाठी आराखडा देणे तसेच त्याला मंजुरी देता येणार नाही. अशा अनेक अटींमुळे आता विविध समस्या निर्माण होताना दिसणार आहेत. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती परिसरात मात्र आचारसंहिता राहणार नाही. ग्रामीण भागातील ग्राम पंचायतीच्या परिसरात मात्र काटेकोरपणे आचारसंहितेचे पालन करावे लागणार आहे. याचबरोबर इतर विकासकामांना आळा घालण्यात येणार आहे. त्यामुळे आचारसंहिता भंग होवू नये यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले.
परिपत्रके किंवा साहित्य वाटपावर निर्बंध ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी कोणत्याही नेत्याचे किंवा लोकप्रतिनिधींचे फलक तसेच पत्रके लावता येणार नाहीत. त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. कोणताही उमेदवार किंवा त्यांच्या समर्थकांकडून अशा प्रकारे परिपत्रके किंवा साहित्याचे वाटप होत असेल तर त्याची माहिती संबंधितांना देऊन ते जप्त करण्यात यावे, असे आवाहनही तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी केले आहे. यावेळी तालुक्मयातील अनेक पीडीओ या बैठकीला उपस्थित होते.