प्रतिनिधी/ सातारा
खटाव तालुक्यातील दिव्यांग केंद्र प्रमुख अप्पा गुरुजी पुढाऱयांच्या अडकित्यात सापडल्याने त्यांच्यावर कारवाई झाली आहे. त्याबाबत ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध करताच शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. अप्पा गुरुजींशी शिक्षण विभागाची चर्चा सुरु आहे. त्यांच्यावरील अन्यायाचे पडसादर शिक्षण व अर्थ समितीच्या मंगळवारी होणाऱया सभेत उमटणार आहेत. तसेच शाळा सुरु करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावरही खल होणार आहे.
खटाव तालुक्यातील जाखणगाव केंद्रावरचे केंद्र प्रमूख अप्पा गुरुजी यांच्यावर चुकीचा ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई चुकीच्या पद्धतीने झाल्याची वारंवार अप्पा गुरुजी विनंती करत आहेत. मात्र, त्यांचे कोणीही ऐकून घेत नव्हते. उलट त्यांनाच म्हणणे मांडता आले नाही असे सांगून आपलीच बाजू प्रशासन रेमटून नेत असल्याचे अप्पा गुरुजी वारंवार सांगत होते. ‘तरुण भारत’ने बातमी प्रसिद्ध करताच व मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाचा इशारा देताच शिक्षण विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. अप्पा गुरुजींना चर्चेला बोलवले जात असून त्यांच्यावरील अन्यायाचे पडसाद मंगळवारी होणाऱया शिक्षण व अर्थ समितीच्या बैठकीत उमटणार आहेत. तसेच राज्य शासनानेही शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसर शाळा सुरु करण्याकरता काय काय करावे लागेल यावर चर्चा होणार आहे. तसेच कोव्हिड 19 साठी निधी किती आला आहे. खर्च किती झाला आहे. त्यावरुनही चर्चा होण्याची शक्यता आहे.