कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने घेतली खबरदारी
प्रतिनिधी /बेळगाव
एसएसएलसी परीक्षेला सोमवार दि. 19 पासून प्रारंभ होत आहे. सोमवार व गुरुवारी असे दोन दिवस परीक्षा असणार आहे. यावषी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने खबरदारी घेतली असून, परीक्षा केंद्रांवर सर्व त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यावषी बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असल्यामुळे विद्यार्थ्यांना ओएमआर उत्तरपत्रिकेवर गोळे भरून उत्तरे भरायची आहेत.
परीक्षा जरी सोमवारपासून असली तरी शिक्षण विभागाने काही दिवस आधीपासूनच जय्यत तयारी केली होती. प्रत्येक वर्गामध्ये केवळ 12 विद्यार्थी असल्याने परीक्षा केंद्रांची संख्या वाढली आहे. यामुळे नवीन परीक्षा केंद्र शोधून त्यामध्ये सर्व सोयी ठेवण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर वैद्यकीय कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. आसन क्रमांक घातल्यानंतर प्रत्येक वर्गात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली आहे.
प्रश्नपत्रिकेचे स्वरुप बदलले असले तरी विद्यार्थ्यांनी त्याचे दडपण घेऊ नये, विद्यार्थ्यांना परीक्षा देणे सोयीचे व्हावे यासाठी बहुपर्यायी प्रश्नपत्रिका काढण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ योग्य पर्याय ओएमआर उत्तरपत्रिकेवर भरायचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजर राहून परीक्षा द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.