बेंगळूर/प्रतिनिधी
राज्य सरकारने वाढती कोरोनाची संख्या लक्षत घेता बेंगळूरसह आठ शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सीआरपीसीच्या कलम १४४ अन्वये १० ते २० एप्रिल दरम्यान रात्री दहा ते पहाटे पाच या वेळेत लोकांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात येणार असून केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी दिली जाईल, असे बेंगळूरचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी रात्री १० च्या आधी घरी जाणे आवश्यक आहे.
पोलीस आयुक्त पंत यांनी केवळ आवश्यक वस्तू व सेवांची वाहतूक करणार्या वाहनांनाच चालण्यास परवानगी दिली जाईल, असे म्हंटले आहे. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी रात्री १० च्या आधी कामाच्या ठिकाणी पोचणे आवश्यक आहे आणि पहाटे ५ नंतरच निघणे आवश्यक आहे. रात्री १० नंतर येणार्या लोकांना कारवाईचा सामना करावा लागणार आहे.
पब, रेस्टॉरंट्स, हॉटेल आणि इतर व्यावसायिक संस्था रात्री १० च्या आधी बंद होणे आवश्यक आहे आणि त्यांचे कर्मचारी रात्री १० च्या आधी घरी परत जावे. बेंगळूरला तर ठिकाणांहून प्रवास करणारे किंवा विमानाने, ट्रेनने किंवा बसने रात्री १० नंतर घरी जाताना किंवा बसमधून प्रवास करता येत असला तरी ते थांबविल्यावर आवश्यक ते कागदपत्र पोलिसांकडे सादर केले पाहिजेत.