शुक्रवारपर्यंत धोका कायम : धरण परिसरात सावधगीरीची गरज
प्रतिनिधी / पणजी
राज्यात आजपासून 15 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने जाहीर केला आहे. त्याचबरोबर हा मुसळधार पावसाचा धोका 16 ऑक्टोबरपर्यंत वाढू शकतो. काल सोमवारी गोव्यात जोरदार वादळी वाऱयासह पाऊस पडला.
बंगलाच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाचे वादळात रुपांतर झाले असून हे वादळ आज मंगळवारी आंधप्रदेशाच्या किनारपटीला धडकण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याचा प्रभाव थोडा कमी होईल. पंरतु त्यामुळे पावसाचा जोर तेलंगण व तेथून उत्तर कर्नाटक आणि तेथून गोव्यात पोहचणार आहे. परंतु वादळाचा प्रभाव आजपासून जोरदार पावसातून दिसून येईल. हवामान खात्याने पुढे म्हटले आहे की, सोमवारी गोव्यात जोरदार वादळी वाऱयासह पाऊस पडला. आणि विजांच्या गडगडाटासह आजपासून पुढील तीन दिवस पावसाचा प्रभाव राहील. त्यानंतर 16 ऑक्टोबरप पर्यंत गोव्यात जोरदार पावसाचा प्रभाव राहील.
दरम्यान गेल्या चोवीस तासात म्हापसा, काणकोण, दाबोळी येथे प्रत्येकी दीड इंच पाऊस पडला. वाळपईत 1 इंच, फोंडा, पेडणे आणि सांखळी येथे प्रत्येकी पाऊण इंच, आणि पणजी, मडगाव, जुने गोवे, मुरगाव व केपे येथे प्रत्येकी 1 से. मी. पावसाची नोंद झाली.
शेतीचे नुकसान आणि पुराचीही शक्यता
दरम्यान आजपासून होणारा हा पाऊस विक्षुप्त असल्यामुळे काही भागात मुसळधारपणे कोसळू शकतो. प्रत्यक्षात गोव्याच्या पुर्वोत्तर भागातील घाट भागात व सहय़ाद्री पर्वताच्या रांगेमध्ये तो जोरदारपणे कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही प्रमाणात गोव्यात पूर येण्याची शक्यता आहे. विशेषत: अस्नोडा, डिचोली, सांखळी, सत्तरीतील नद्या, सांगे, काणकोणच्या काही भागामध्ये पुराची दाट शक्यता आहे.
राज्यातील सर्व धरणे तुडुंब
राज्यातील सर्व धरणे सध्या तुडुंब भरलेली आहेत. अंजुणे धरणात एकूण 93 मीटर पाण्याची क्षमता आहे. सध्या धरणात 93 मीटर पाणी भरललेले आहे. मौसमानंतरचा होणारा हा पाऊस मुळधारपणे कोसळल्यास साखळीच्या वाळवंटी नदीला पूर येऊ शकतो. तसेच सध्याची अंजुणे धरणची क्षमता पहाता आणखी पाणी साठवून ठेवणे अशक्य होईल. आजपासून पडणाऱया मुसळधार पावसाने धरण क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात पाणी उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाच्या सर्व गेट खुल्या कराव्या लागतील. यामुळे अनेक भागात पुराची शक्यता जास्त आहे. या बरोबरच म्हादई नदीची देखील हीच परिस्थिती आहे. हवामान खात्याने मच्छीमारांना पुढील तीन दिवसात समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे.