रमेश तवडकर यांचा दावा : विकास स्थानिक लोकप्रतिनिधी अपयशी
प्रतिनिधी /पणजी
आजही आपाल्य सोबत आदीवासी समाज असल्याचा दावा रमेश तवडकर यांनी केला आहे. आपल्याला विरोध करणाऱयांना आत्ता कोणताच मुद्दे मिळत नसल्याने त्यांनी आदवासी लोकांचा म्द्दु काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे रमेश तवडककर यांनी सांगितले. स्थानिक लोकप्रतिनिधी विकास कामे करण्यास अपयशी ठरले असून आपल्या विरोधात चुकीचा प्रचार करीत असल्याचेही तवडकर म्हणाले.
मिरामार येथे रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रमेश तवडकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की आपण मंत्री असताताना झालेली विकास कामे आणि आता आपल्या मंतदारसंघातील परिस्थिती काय आहे, याची मतदार तुलना करीत आहेत. मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास स्थानिक लोकप्रतिनिधी अपयशी ठरले असल्याने आपल्या विरोधात चुकीची माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही तवडकर यांनी सांगितले.
मागील विधानसभा निवडणुकीतही आपणच जींकलो असतो मात्र अवघे पंधरा दिवस असताना आपल्या विरोधात षंडयंत्र करून आपल्याला डावलण्यात आले. आता आपल्याला साडेचार वर्षे मिळाली त्यात आपण सविस्तर अभ्यास केला आपले मतदार आजही आपल्या सोबत असल्याचे दिसून आले आहे. तसेच आपल्या मतदार संघातील काही ज्वलंत प्रश्न सोडविण्यास स्थानिक लोकप्रतिनिधी कसे अपयशी ठरले आहेत त्याचाही अभ्यास करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. 2017 निवडणूकाच्या वेळी तरुणांना नोकरभरतीचे गाजर दाखवून लोकप्रतिनिधीनी आपल्या बाजूने वळविले होते. आत्तापर्यंत एकाही तरुणाला नोकरी दिल्याचे दिसून येत नाही, त्यामुळे हे एक मोठे अपयश असल्याचे तवडकर यांनी सांगितले. अदीवाशी समाज भागातील लोकांचा अत्यंत संवेदनशील प्रश्न होता तो म्हणजे लोकांच्या जमनी त्यांच्या ताब्यात देणे, याबाबतही कोणतेच प्रयत्न केलेले नाही हेही अपयश आहे. तसेच राखीव वनाचा विषय अजूनही तसाच पडून राहिलेला आहे. लोकांच्या घरा समोरून दगड घालण्यात आले आहेत. महत्वाचा प्रश्न म्हणजे लोकांना आजही पण्यासाठी वणवण करावी लागते. आपण मंत्री असताना पाणी प्रश्न सोडविण्यासाठी अर्ध्याअधिक काम पूर्ण केले होते. ते पुढे नेले असते तर आज लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटला असता मात्र तसेच झालेले नसल्याचे दिसून येत आहे. एकूणच लोकप्रतिनिधी पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. असेही तवडकर यांनी सांगितले.