नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी ईशान्य भारतातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोना उद्रेक आणि लसीकरण या संदर्भात चर्चा करणार आहेत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. हा निर्णय घेण्याआधी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी ईशान्य भारतातील सरकारांशी चर्चा केली.
ईशान्य भारतात पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे तेथील राज्यांची तयारी किती प्रमाणात आहे, याची चाचपणी पंतप्रधान मोदी करणार आहेत. ते काही महत्वाच्या सूचनाही करतील. जुलै महिन्याच्या प्रारंभी केंद्र सरकारने ईशान्येतील सहा राज्यांसाठी बहुआयामी तज्ञा समितीची स्थापना केली होती. आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम या राज्यांसाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती. या राज्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागल्याने हा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला होता.
90 जिल्हय़ांमध्ये 80 टक्के
देशात सध्या असणाऱया कोरोना रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण 90 जिल्हय़ांमध्ये आढळून आले आहेत. यांपैकी 14 जिल्हे ईशान्य भारतातील आहेत. 17 जिल्हय़ांमध्ये बाधितांची टक्केवारी 10 हून अधिक आहे. यांपैकी तब्बल 46 जिल्हे ईशान्य भारतातील राज्यांमधले आहेत. अरुणालच प्रदेशात बाधित प्रमाण 16.2 टक्के आहे. ही स्थिती चिंताजनक असल्याने केंद्राकडून विशेष प्रयत्न होत आहेत.