प्रतिनिधी / सांगली
गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामीण भागातील राबलेल्या कार्यकर्त्यांच्या कामाची पोहोच आणि ग्रामपंचायतीच्या मैदानात नशिब अजमावणाऱया पाच हजारांवर उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा आज फैसला होणार आहे. आज होणाऱया मतमोजणीसाठी 677 कर्मचारी आणि अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली असून सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच दीड हजारांवर जागांचे निकाल जाहीर होणार आहेत.
जिल्हÎात 152 पैकी दहा ग्रामपंचायती यापूर्वीच्या बिनविरोध झाल्याने 142 ग्रामपंचायतींसाठी पंधरा दिवसांपासून जोरदार प्रचार सुरू होता. शुक्रवारी 142 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. या निवडणुकीत 551 प्रभागातील 1508 जागासाठी 5 हजार 65 उमेदवार रिंगणात होते. यावेळी सर्वत्र चुरशीने मतदान झाले. मतदारांनीही चांगला प्रतिसाद दाखवल्या मतदानाची टक्केवारी 80.22 पर्यंत पोहोचली. त्यामुळे मतमोजणीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. उत्सुकता शिगेला पोहोचली असून निकालासाठी अनेक ठिकाणी पैजाही लागल्या आहेत.
प्रशासनानेही मतमोजणीची जय्यत तयारी केली आहे. मिरज तालुक्यासाठी शासकीय गोडावऊन मिरज वैरण बाजार येथे, तासगावमध्ये तहसिल कार्यालय बहुउद्देशीय हॉल, जत जुने शासकीय धान्य गोदाम, कवठेमहांकाळ तहसिल कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, विटयामध्ये खानापूर रोड उपविभागीय कार्यालयासमोर जुने शासकीय धान्य गोदाम, पलूस प्रशासकीय इमारत, कडेगाव तहसील कार्यालय, इस्लामपूरमध्ये नवीन तहसिल कार्यालय, आणि शिराळा तहसील कार्यालय येथे मतमोजणी होणार आहे.
एकूण 131 टेबलवर मतमोजणी होणार असून मतमोजणीच्या 49 फेऱया होणार आहेत. 134 मतमोजणी पर्यवेक्षक, 198 मतमोजणी सहाय्यक, आणि 351 इतर कर्मचारी असे 677 कर्मचारी अधिकारी मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. सर्व कर्मचारी आणि अधिकाऱयांचे मतमोजणीसाठी प्रशिक्षणही पूर्ण करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. साधारणतः अकरा ते बारा वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील. जत आणि तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींची संख्या सर्वाधिक आहे. जत मध्ये 36 टेबलवर सहा फेऱयात मतमोजी हाणार आहे. तर तासगाव तालुक्यत मतमोजणीच्या 24 टेबलवर नऊ फेऱया होतील, अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी विजया यादव यांनी दिली.
निवडणूक शांततेत पार पडली तरी निकालानंतर अनेक गावात राडे होण्याची शक्यता गृहीत धरून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्व पॅनेल प्रमुखांना विजयी मिरवणूका काढू नयेत अशा नोटीसा पोलिसांनी आधीच बजावल्या आहेत. त्याचबरोबर संवेदनशिल गावांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.