श्रीमंत बाबासाहेब देशमुख जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजन: अमरसिंह देशमुख यांचे प्रोत्साहन
प्रतिनिधी/आटपाडी
आटपाडी तालुक्याचे शिल्पकार, खानापुर आणि आटपाडी पंचायत समितीचे पहिले सभापती, माणगंगा साखर कारखान्याचे संस्थापक कै.श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 1 लाख पुस्तके वाचण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. आज गुरूवारपासुन या अनोख्या सोहळय़ाची सुरूवात होत असुन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या प्रेरणेतुन वाचन संस्कृती समृध्द करण्याचा हा उपक्रम आहे.
स्वातंत्र्यपुर्व कालखंडापासुन स्वातंत्र्योत्तर कालावधीपर्यंत म्हणजे 1923 ते 1986 पर्यंत आटपाडी तालुक्याच्या निर्मीतीपासुन प्रगतीपर्यंत भरीव योगदान देण्याचे काम श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनी केले. आटपाडी एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनी 1953पासुन शैक्षणिक चळवळ समृध्द केली. जिल्हा लोकल बोर्डचे प्रतिनिधी, विनोबा भावे यांच्या भुदान कार्यक्रमातील सक्रिय सदस्य, खानापुर पंचायत समितीचे पहिले सभापती, आटपाडी तालुक्याची संघर्षातुन निर्मीती करत बाबासाहेब देशमुख 1965मध्ये आटपाडी पंचायत समितीचे पहिले सभापती बनले.
श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षाला गुरूवारपासुन सुरूवात होत असुन त्यानिमित्ताने त्यांचे सुपुत्र सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आटपाडीचे शाखेचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या संकल्पनेतुन कार्यरत वाचन कट्टातर्फे 1 लाख पुस्तके वाचण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गत चार वर्षापासुन शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सर्वांसाठी पुस्तक वाचन स्पर्धा आयोजित केली जात आहे. विविध प्रकारची पुस्तके वाचणे, त्याची टिपणी काढुन या स्पर्धेत सहभागी होण्याचा आगळावेगळा उपक्रम चर्चेत आहे.
वाचन उपक्रमाचे कार्यवाह दिनेश देशमुख, मुख्याध्यापक प्रकाश नामदास, प्रा.श्रीकृष्ण पडळकर, प्रा.विजय शिंदे, सारिका देशमुख, प्राचार्य विजय लोंढे, आटपाडी एज्युकेशनचे सचिव एच.यु.पवार, मिलींद वाले, कवी सुभाष कवडे यांच्यासह मान्यवरांचा सहभाग, प्रोत्साहन वाचन समृध्दीसाठी मिळत आहे. श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 10 मार्च 23 पर्यंत 1 लाख पुस्तके वाचण्याचा उपक्रम होत असुन त्यात समाजातील सर्व घटकांनी सहभागी होवुन वाचक चळवळ समृध्द करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन वाचन कट्टा व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे-शाखा आटपाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांचा कार्य परिचय
औंध संस्थान काळात प्रौढ शिक्षणासाठी पुढाकार.
खानापुर पंचायत समितीचे पहिले सभापती.
आटपाडी तालुक्याची संघर्षातुन निर्मीती.
आटपाडी पंचायत समितीचे पहिले सभापती.
शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजारामबापु पाटील, शरद पवार, बाळासाहेब देसाई, ग.दि.माडगुळकर, डाŸ.शंकरराव खरात, बŸ.आफ्पासाहेब पंतप्रतिनिधी यांच्याशी विशेष स्नेहाचा वापर जनसेवेसाठी.
1953मध्ये आटपाडी एज्युकेशन सोसायटीची स्थापना
जिल्हा लोकल बोर्डचे प्रतिनिधी
दुष्काळ निर्मुलनासाठी आटपाडी तालुक्यात तलाव, नाला बंडींगची भरीव कामे.
आटपाडी बाजार समितीची स्थापना.
हरितक्रांती, रोहयोतुन लोकांना, शेतकऱयांना दिलासा.
आटपाडी सुतगिरणी उभारणी
माणगंगा सहकारी साखर कारखाना उभारणी