प्रतिनिधी/ बेळगाव
हुक्केरी तालुक्मयातील मणगुत्ती गावामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटविण्यात आला. त्यामुळे समस्त शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. आठ दिवसांत हा पुतळा बसवला नाही तर शिवभक्त तीव्र आंदोलन करतील. त्यानंतर कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा शिवप्रति÷ान हिंदुस्थान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, शिवजयंती चित्ररथ महामंडळ यांच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्यदैवत आहेत. मात्र, काही मोजक्मया व्यक्तींच्या दबावाखाली प्रशासनाने तेथील शिवाजी महाराजांचा पुतळा हटविला आहे. त्यानंतर मराठी भाषिकांना आणि शिवभक्तांना मारहाणही करण्यात आली आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेव्हा आठ दिवसात हा पुतळा पुन्हा उभारावा, अन्यथा शिवप्रति÷ान हिंदुस्थान आंदोलन करेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. कर्नाटकात सोशल मीडियावर अवमानकारक लिखाण तसेच अभ्यासक्रमातून महाराजांचा इतिहास काढून टाकण्यात आला आहे. हा समस्त हिंदूंचा अवमान आहे. हे प्रकरण चिघळू नये यासाठी तातडीने पुन्हा पुतळय़ाची उभारणी करा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली.
काही मोजक्मया व्यक्तींच्या दबावाखाली हा प्रकार घडला आहे. जर अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा अवमान होत असेल तर संपूर्ण देश पेटून उठेल. तेव्हा याची जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन योग्य क्रम घ्यावा, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली.
शिवसेना
हिंदूंचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा रातोरात काढण्यात आला. त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहे. या घटनेमुळे कर्नाटकबरोबरच महाराष्ट्रातील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तेव्हा ही लाट उसळण्याअगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची उभारणी करावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आम्ही आज हिंदू म्हणून या देशात राहिलो. अन्यथा वेगळीच परिस्थिती झाली असती, याचा विचार सरकारने आणि जिल्हा प्रशासनाने करावा. सध्या आठ दिवसात पुतळा बसविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही शांत आहे. आठ दिवसात पुतळा बसवला नाही तर शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असे निवेदनात म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस
छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य उभे केले होते. त्यांच्यामुळेच आज गोरगरीब जनता स्वतःच्या पायावर उभी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श इतर देशातील नागरिक घेत आहेत. असे असताना बेळगाव जिल्हय़ामध्ये त्यांचा पुतळा काढण्यात येतो, ही बाब निषेधार्ह आहे. तातडीने या पुतळय़ाची पुनउ&भारणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली.
महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना आपले आराध्यदैवत म्हणून मानले जाते. असे असताना त्यांचा अवमान होणे ही बाब गंभीर आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आता तातडीने त्या पुतळय़ाची उभारणी करा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
विविध संघटनांच्यावतीने महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवप्रति÷ान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे, नेताजी जाधव, अजित जाधव, सुनील जाधव, सुनील अष्टेकर, शुभम शेळके, श्रीकांत कदम, धनंजय पाटील, प्रकाश मरगाळे, अनंत चौगुले, अशोक पाटील, सचिन चोपडे, संतोष जैनोजीचे, अभिजीत अष्टेकर, गजानन निलजकर, किरण बडवाण्णाचे, बाबू हणमशेट, प्रकाश नेसरकर, संतोष कृष्णाचे, प्रकाश शिरोळकर, अरविंद नागनुरी, बंडू केरवाडकर, दिलीप बैलूरकर, सचिन गोरले, प्रकाश राऊत, प्रवीण तेजम, दत्ताजी जाधव, रामकृष्ण बोकडे, मुनीर लतिफ, दुर्गेश मेत्री, राजू एम. पाटील, के. जी. पाटील, एल. के. देसाई, शाम मंतेरो, आप्पासाहेब नाईक, अमित गाडेकर, शिवाजी लाड यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.