प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या आठ महिन्यांच्या थैमानानंतर शनिवारी प्रथमच जिल्हÎातील सर्व 12 तालुक्यातील कोरोना रुग्णंसख्या शुन्य राहिली. तर आढळून आलेल्या आठ रुग्णांपैकी तीन रुग्ण शहरातील आहेत. उर्वरीत पाच रुग्ण मुंबई, सिंधुदूर्ग आणि बंगाल येथील आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने समस्त कोल्हापूर वासियांसाठी हे दिलासादायक चित्र आहे.
जिल्हयात मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागला. सुमारे दोन ते तीन महिने कोरोनाने थैमान घातले. यानंतर कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होण्यास सुरवात झाली. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग अटोक्यात आला असून रुग्ण संख्या शंभरच्या आत होती. गेल्या आठ महिन्यात शनिवारी प्रथमच रुग्ण संख्या एकेरी अंकावर आली आहे. शहर वगळता जिल्हÎातील सर्व 12 तालुक्यांसह, नगरपालिका क्षेत्रात शनिवारी एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. तर दिवसभरात 30 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच मृत्यू संख्याही शून्य आहे. सक्रीय रुग्ण संख्या 164 इतकी आहे.