बेंगळूर : कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने आणखी चार जिल्हे अनलॉक करण्याचा आदेश राज्य सरकारने मंगळवारी दिला. पॉझिटिव्हिटी प्रमाण 5 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या मंगळूर, हासन, दावणगेरे आणि चामराजनगर जिल्हय़ातील लॉकडाऊन नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणण्यात आली आहे. सकाळी 6 ते दुपारी 1 पर्यंत आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी परवानगी दिली आहे. याद्वारे टप्प्याटप्प्याने सरकार एक-एक जिल्हे अनलॉक करीत आहे. सोमवारी शिमोगा, बळ्ळारी, विजापूर, चित्रदुर्ग आणि बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ांमध्ये अनलॉकची घोषणा केली होती. तर म्हैसूर, उडुपी, चिक्कमंगळूर आणि कोडगूमधील लॉकडाऊनच्या नियमात कोणतेच बदल केलेले नाहीत.
Previous Articleपुढील मुख्यमंत्र्याबाबत हायकमांडच निर्णय घेईल
Next Article यंदा 25 लाख घरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.