गेल्या 3 दिवसात 8 जणांचा मृत्यू
रेवाडी / वृत्तसंस्था
हरियाणाच्या टिकरी सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान आणखी दोन शेतकऱयांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही शेतकरी आंदोलनस्थळी वेगवेगळय़ा ठिकाणी मृतावस्थेत आढळून आले. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून पोलिसांनी दोघांचेही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. एकंदर गेल्या अकरा महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या तीन दिवसांत या आंदोलनात 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
हिवाळा सुरू झाल्यानंतर आंदोलनात बसलेल्या अनेक वयोवृद्धांची प्रकृती ढासळू लागली आहे. शुक्रवारी रात्री 12.30 च्या सुमारास फिरोजपूर जिल्हय़ातील काबर बच्चा गावात राहणारे 57 वषीय जगतार सिंग यांचा मृतदेह नजफगड उड्डाणपुलाजवळ आढळून आला. त्याचवेळी, किसान चौकाजवळील जिंद जिल्हय़ातील शाहपूर कंडेला येथे राहणाऱया 60 वषीय करण सिंग यांचाही टिकरी सीमेवर मृत्यू झाला. करणसिंग सकाळी 6 वाजता दूध घेऊन तंबूत परतल्यानंतर ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. यापूर्वी 28 ऑक्टोबरच्या रात्री आंदोलनस्थळी बसलेल्या पंजाबमधील बंथिडा येथील रहिवासी 55 वषीय धरम सिंग आणि रिपन सिंग यांचा मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. येथे 29 ऑक्टोबर रोजी सिंघू सीमेवर 95 वषीय निहंग सोहन सिंग यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता.