सातारा / प्रतिनिधी
सातारा-कोरेगाव स्त्यावर खावली पर्यंत मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.अपघात होत आहेत.याकडे दुर्लक्ष होत असल्याने रिक्षा चालकांनी स्वतः आज खड्डे भरून घेण्यात आले.त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
सातारा-कोरेगाव स्त्यावर संगम माहुली पुलाच्या दोन्ही बाजुला कूष्णा-वेण्णा नदी वाहते पुल अरूंद असल्याने वाहनचालकाना पुलावरून गाडी चालवताना कसरत करावी लागते. दुदैर्वाने चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी खाली कोसळली तर गंभीर अपघात होण्याची भिती आहे.अशा घटना यापूर्वी घडल्या असून पुलाच्या धोकादायक वळणामुळे दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढत चालली आहे.तसेच सातारा पासून खावली पर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.
सातारा-पंढरपुर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम चालू झाले असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले आहेत. गाड्याचे अपघात होतात.आज सकाळी संगम माहूली गावातील रिक्षाचालक स्टाॅप संघटना युवकांनी खड्डे भरले. यावेळी उध्दव सावंत, प्रकाश नेवशे, अमोल कोळपे, चंद्रकात घोरपडे, सुनिल सुतार, नितीन घोरपडे, लखन सुपेकर, राहूल पडवळ यांनी एकञ येवून रस्त्यावरचे खड्डे मुरूम टाकून भरून घेतले.नव्याने रस्ता उभारणी चे काम लवकर होणे गरजेचे आहे, अशी मागणी संगम माहुली ग्रामस्थ करीत आहेत.