ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस देशात वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता कोरोनाची तपासणी व उपचार हे आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहेत असे स्पष्ट करण्यात आले.
आयुष्यमान भारत ही मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांमधील एक योजना आहे. गरीब जनतेला डोळ्यासमोर ठेवून ही योजना बनविण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे आता या योजनेअंतर्गत नागरिकांना कोरोनाची तपासणी आणि उपचार हे खाजगी दवाखान्यात ही करता येणार आहेत. याचा सर्व खर्च केंद्र सरकार करणार आहे.
या निर्णयामुळे गरीब व ग्रामीण भागातील लोकांना उपचाराची सुविधा उपलब्ध होणार असून सरकारी दवाखाना वरील ताणही कमी होईल.
दरम्यान, कोरोनाच्या संख्येत वाढ होत असून देशात आत्तापर्यंत तीन हजार पेक्षा अधिक नागरिकांना कोरोना ची लागण झाली आहे. तर 70 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.