प्रतिनिधी/ सातारा
कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने, कडक लॉकडाऊन जारी केले आहे. तरी ही विविध आर्थिक कारणांसाठी वारंवार नागरिकांची गर्दी ही बँकांमध्ये होत आहे. येथे होणाऱया या गर्दीमुळे कोरोना होण्याची शाशंकता अधिक प्रमाणात बळावत आहे.
याचीच दखल घेत आता फिरते एटीएम केंद्राची व्यवस्था एसबीआय बँकेतर्फे करण्यात आली आहे. याअंतर्गत संबंधीतांच्या दारातच हे फिरते एटीएम सोईसाठी दाखल होणार आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय ही चांगलीच टळणार आहे.