पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांची माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकानेच सहकार्य करणे गरजेचे आहे. अनावश्यक कोणीही दुचाकी वाहने घेवून बाहेर पडू नये. अन्यथा ती वाहने जप्त करण्यात येत आहेत. सदर वाहने जप्त केल्यानंतर वाहन चालकाला न्यायालयातूनच सदर वाहने सोडवून घ्यावी लागणार आहेत. तेंव्हा प्रत्येकाने याची दखल घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी केले आहे.
विनाकारण घराबाहेर पडणे टाळा. दुचाकी घेवून नाहक बाजारपेठेत येणे असे प्रकार घडत आहेत. मात्र असा प्रकार करण्याचे थांबावे. कारण कोरोनाचा हा प्रादुर्भाव अत्यंत भयानक आहे. स्वतःचेही आणि दुसऱयाचे आरोग्य धोक्मयात येवू शकते. त्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करणे गरजेचे आहे. आतापर्यंत बेळगावच्या जनतेने बऱयापैकी सहकार्य केले आहे. मात्र अतिउत्साही असलेल्या या वाहन चालकांनी आवार घालावा अन्यथा त्यांना मोठा फटका बसणार आहे.
प्रत्येकाने दखल घेवून प्रशासनाला सहकार्य करावे
वाहने जप्त करून दंड घेवून यापूर्वी सोडण्यात येत होते. मात्र आता वाहने जप्त केल्यानंतर ती पोलीस स्थानकातून सोडण्यात येणार नाही तर संबंधितांवर न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयातूनच ती वाहने सोडवून घ्यावी लागणार आहेत. त्यामुळे मोठा दंड भरावा लागणार आहे. तेंव्हा याची प्रत्येकाने दखल घ्यावी आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी केले आहे.