ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोणतीही व्यक्ती जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये जमीन खरेदी करून तिथे स्थायिक होऊ शकतो, असा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गृहमंत्रालयाने आज यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
गृहमंत्रालयाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आता कोणतीही व्यक्ती जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये जमीन खरेदी करू शकतो. तसेच तिथे वास्तव्य करू शकतो. मात्र, लागवड केलेल्या जमिनीवरील बंदी कायम राहील. या आदेशाला केंद्रशासित प्रदेश ऑफ जम्मू-काश्मीर पुनर्रचना थर्ड ऑर्डर, 2020 असे म्हटले जाईल.
जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या मते, जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरचे उद्योग स्थापन व्हावेत अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे औद्योगिक जमिनीत गुंतवणूक करण्याची गरज आहे. पण लागवड केलेली जमीन राज्यातील जनतेकडेच राहील. यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये फक्त रहिवासीच जमीन खरेदी अथवा विकू शकत होते. मोदी सरकारच्या नव्या अधिसूचनेनुसार बाहेरच्या लोकांना येथे जमीन खरेदी करता येणार आहे.