प्रादेशिक आयुक्तांच्या एंट्रीअगोदर बिम्समध्ये हालचालींना वेग : अधिकारी आपल्या अंगावर पीपीई किट घालून लागले कामाला
प्रतिनिधी / बेळगाव
नाकर्तेपणामुळे बदनाम झालेल्या बिम्स प्रशासनावर इलाज करण्यासाठी प्रादेशिक आयुक्त आदित्य आमलान बिस्वास यांची प्रशासकीय व्यवस्थेवर देखरेख करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे बिम्समधील प्रस्थापित व्यवस्थेला चांगलाच हादरा बसला असून शनिवारी राज्य सरकारने यासंबंधी अधिकृत आदेश जारी केल्यानंतर रविवारी बिम्समधील बहुतेक अधिकारी आपल्या अंगावर पीपीई किट घालून कामाला लागले आहेत.
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा सामना करताना सिव्हिल हॉस्पिटलमधील व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. त्याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसला. बेड नाही, औषधे नाहीत असा नन्नाचा पाढा वाचत रुग्णांना वाटेला लावण्यात आले. सिव्हिलच्या दारातच उपचाराविना अनेकांचा मृत्यू झाला. त्यामुळे बिम्स प्रशासनाविरुद्ध बेळगावकरांच्या भावना तीव्र झाल्या. बिम्सवर टीका वाढताच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री येडियुराप्पा बेळगावला आले.
मुख्यमंत्र्यांनी जिल्हय़ातील लोकप्रतिनिधी व वरि÷ अधिकाऱयांची सुवर्ण विधानसौधमध्ये बैठक घेतली. या बैठकीतही बिम्स प्रशासनावर टीकेची झोड उठली. त्यामुळे शुक्रवारी प्रशासकीय व्यवस्था पाहण्यासाठी आदित्य आमलान बिस्वास यांच्या नावाची घोषणा करून दुसऱयाच दिवशी सरकारने यासंबंधी अधिकृत आदेश जारी केला. यावरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते.
सोमवारपासून प्रादेशिक आयुक्त बिस्वास हे बिम्सवर इलाजाला सुरुवात करणार आहेत. त्याआधीच बिम्स प्रशासनाला खडबडून जाग आली असून रविवारी अंगावर पीपीई किट घालून बहुतेक अधिकाऱयांनी वेगवेगळय़ा वॉर्डचा फेरफटका मारला आहे. कोरोनाबाधितांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने जर महिनाभरापूर्वीच हा निर्णय घेतला असता तर गोरगरीब रुग्णांची परवड तरी थांबवता आली असती, असे चित्र पाहायला मिळते आहे.
रविवारी बिम्सचे प्रभारी वैद्यकीय संचालक डॉ. उमेश कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश दंडगी, जिल्हा सर्जन डॉ. सुधाकर, आरएमओ डॉ. केशव, डॉ. इरण्णा पल्लेद आदी वरि÷ांनी कोविड वॉर्डसह वेगवेगळय़ा वॉर्डना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली आहे. बिम्सच्या सीईओ आफ्रिनबानू बळ्ळारी यांनीही लसीकरण केंद्र आणि कंट्रोल रुमला भेट देऊन पाहणी केली आहे.
25 एप्रिल रोजी प्रादेशिक आयुक्तांनी बिम्समधील कारभारात सुधारणा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वरि÷ अधिकाऱयांची बैठक घेतली होती. त्यावेळी रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत होती. सरकारी इस्पितळातील सुविधा अधिक बळकट करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी ही बैठक बोलाविली होती. मात्र, या बैठकीला बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांनी दांडी मारली होती. याच बैठकीत नोडल अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकाऱयांची नियुक्ती केली होती. एक ते दीड महिना आधीपासूनच प्रादेशिक आयुक्तांनी बिम्सवर सर्जरी करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. त्यावेळचे जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनीही बिस्वास यांच्या प्रयत्नांना साथ दिली होती.
बिम्समध्ये नेमका कसा कारभार चालतो? विविध विभागांचे प्रमुख रुग्णसेवेसाठी रोज बिम्सला हजेरी लावतात का? केवळ कनि÷ डॉक्टरांवर जबाबदारी सोपवून अनेकजण निवांत बसले आहेत. त्यांच्यावर कारवाई का होत नाही? कंत्राटी कर्मचाऱयांच्या मानधनात कपात केली जात आहे. एका कर्मचाऱयामागे दोन हजार रुपये आपल्या खिशात टाकणारा महाभाग कोण आहे? आपण गोरगरिबांच्या सेवेसाठी या पदावर आहोत, याचा विसर पडल्यामुळे की काय? आपणच बिम्सचे मालक आहोत, या थाटात वावरणाऱया कामचुकारांमुळे बिम्स बदनाम होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार दीड महिन्यापासून प्रादेशिक आयुक्तांनी सुरू केला होता. आता राज्य सरकारने बिम्सवर उपचार करण्याची अधिकृत जबाबदारी सोपविल्यामुळे कामचुकारांचे धाबे दणाणले असून गेंडय़ाच्या कातडीच्या प्रशासनामध्ये कितपत सुधारणा होते, हे पाहावे लागणार आहे.
बिम्सच्या बदनामीला जबाबदार कोण?
गोरगरिबांना खासगी इस्पितळांच्या धर्तीवर सिव्हिलमध्ये सेवा मिळावी, यासाठी एन. धरमसिंग मुख्यमंत्री असताना तत्कालिन पालकमंत्री प्रकाश हुक्केरी यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे बेळगावला सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. अनेक अडथळे पार करून प्रकाश हुक्केरी यांनी बिम्स उभारले. सुरुवातीच्या काळात डॉ. गुरुमूर्ती, एम. आर. चंद्रशेखर, डॉ. रामय्या आदींसारख्या उत्तम प्रशासकांच्या हाती बिम्सचा कारभार होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही बिम्सने थोडय़ा प्रमाणात का होईना, चांगली कामगिरी केली होती. दुसऱया लाटेचा सामना करताना बिम्स प्रशासन पूर्णपणे ढेपाळले. राज्य पातळीवर बिम्सची बदनामी झाली. वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांना दीर्घ मुदतीच्या रजेवर जावे लागले. बिम्सच्या बदनामीला जबाबदार कोण? याचा शोध घेऊन ‘तुम्ही मालक नाही, सेवक आहात’ याची जाणीव करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.