तिकीट दरातील वाढीचा प्रवाशांच्या खिशावर ताण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तिकीट दरात 12.5 टक्क्मयांनी वाढ केल्याने देशात विमानप्रवास महागला आहे. नागरी विमानोड्डाण मंत्रालयाने गुरुवारी रात्री तिकीट दरवाढीसंबंधी घोषणा केली. त्यानंतर हा निर्णय शुक्रवारपासूनच देशात लागू करण्यात आला आहे. वाढलेल्या तिकिटाच्या दराचा परिणाम कमीतकमी आणि अधिकाधिक किंमतीवर होणार आहे. त्याचसोबत केंद्र सरकारने देशातील सर्व विमानसेवांच्या देशांतर्गत संख्येत 7.5 टक्क्मयांनी वाढ करण्यास परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विमानसेवा कंपन्यांना दिलासा मिळणार असला तरी सर्वसामान्य विमानप्रवाशांच्या खिशावर ताण पडणार आहे.
तिकीट दरातील 12.5 टक्क्मयांच्या वाढीमुळे आता दिल्ली ते मुंबईसाठी 5,287 रुपये (कमीत कमी दर) भाडे द्यावे लागणार आहे. यापूर्वी प्रवाशांना 4,700 रुपये मोजावे लागत होते. अधिकाधिक भाडय़ाबद्दल बोलायचे झाल्यास दिल्ली ते मुंबईसाठी 13 हजार रुपये तिकीट होते. मात्र हेच तिकीट आता 14,625 रुपये झाले आहे. कोरोना व्हायरसच्या महासंकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विमानाने प्रवास करणाऱया प्रवाशांच्या संख्येत घट झाली होती. याचा फार मोठा परिणाम एअरलाईन्स कंपन्यांवर पडला होता.
प्रवासी संख्या वाढविण्यास अनुमती
प्रवाशांची संख्या वाढवण्यास एअरलाईन्स कंपन्यांना मंजुरी दिल्यामुळे आता देशांतर्गत विमानसेवेसाठी प्रवाशांची संख्या 65 वरून 72.5 टक्के करण्यात आली आहे. यापूर्वी 21 जून रोजी केंद्र सरकारने देशांतर्गत विमानसेवांच्या दरात 15 टक्क्मयांनी वाढ केली होती. कोरोनाच्या दुसऱया लाटेत देशांतर्गत प्रवाशांची संख्या ही कोविडपूर्वीच 80 टक्क्मयांवरून 50 टक्के केली होती.