परवानगीसाठी सकाळी 10 पर्यंतच अर्ज करावे लागणार
प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊन वाढविण्यात आल्यानंतर विवाहाला परवानगी मिळणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र वाढीव लॉकडाऊन काळातही विवाहांना परवानगी देण्यात येणार आहे. 50 लोकांऐवजी केवळ 40 नागरिकांच्या उपस्थितीत विवाह पार पाडावा लागणार आहे. या परवानगीसाठी तहसीलदार कार्यालयामध्ये सकाळी 10 च्या आत अर्ज घेतले जात आहेत. तरी जनतेने त्यावेळेतच अर्ज द्यावेत, असे आवाहन उपतहसीलदार व्ही. मोहन यांनी केले आहे.
विवाह काळातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे विवाह करणे कठीण झाले आहे. मोठय़ा धामधुमीत होणारे विवाह हे अत्यंत साध्यापद्धतीने आणि मोजक्मयाच व्यक्तींच्या उपस्थितीत पार पाडावे लागत आहेत. कारण हा आजारच गंभीर आहे. त्याबाबत सरकारने नियमावली जारी केली आहे. त्या नियमानुसारच विवाह करण्यास परवानगी देण्यात येत आहे. तेव्हा जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन व्ही. मोहन यांनी केले आहे.
विवाह करा, मात्र ते नियम पाळतच करा. प्रादुर्भाव वाढला आहे. तेव्हा प्रत्येकाने याबाबत काळजी घ्यावी, अशी सूचना केली आहे. परवानगी घेण्यासाठी वधू-वराचे आधारकार्ड, लग्नपत्रिका, अर्ज आणि लग्नाला उपस्थित राहणाऱया व्यक्तींच्या नावांची यादी याचबरोबर जे अर्ज देणार आहेत, त्यांचेही आधारकार्ड द्यावे लागणार आहे.